मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाईप गळतीमुळे वाहने घसरण्याचा धोका

  44

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पोलादपूर शहरातून अंडरपास बॉक्सकटींग पद्धतीने भुमिगत झाला असून या महामार्गालगत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये अनेकदा गळती होऊन पाणी महामार्गाच्या काँक्रीटवर पसरल्याचे दिसून आले. भरपावसामध्ये अशा प्रकारची पाईपगळती सुरू होऊन शेवाळ निर्मिती होत राहिल्यास अंडरपास महामार्गामध्ये वाहने घसरण्याचा धोका निर्माण होणार असल्याने महामार्ग बांधकाम विभागाने तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.


राष्ट्रीय महामार्ग पोलादपूर शहरात मुंबईकडून शिरताना मूळ रस्त्यापासून खाली जात पोलादपूर एस.टी.स्थानकासमोर सुमारे ३२ फूट खोल अंडरपास जातो. चिखलीच्या डोहातील नळपाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसपासून संबंधित गावापर्यंत अंडरपास महामार्गाच्या बॉक्सकटींगच्या तळापासून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. उन्हाळयात या पाईपलाईनला दोनचार ठिकाणी गळती लागल्याने नळपणी योजनेचे पाणी महामार्गाच्या काँक्रीटरस्त्यावरून वाहात जाऊन गारवा निर्माण झाला होता. या गारव्यासोबतच पाणीगळतीमुळे संबंधित योजनांच्या गावांना पाणीपुरवठा मंद गतीने होऊ लागल्याने गळतीची दुरूस्ती करण्यात आली होती.


मात्र, पावसाळयातही या ठिकाणी गळती सुरू झाल्यास पाण्यासोबत शेवाळनिर्मिती होऊन काँक्रीटचा महामार्ग निसरडा होऊन वाहने घसरण्याचा धोका निर्माण होणार आहे. संबंधित नळपाणीपुरवठा योजनेच्या जलजीवन मिशनमार्फत अथवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या पाईपलाईन गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून वेळीच उपाययोजना न झाल्यास या काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याचा धोका उदभवणार आहे.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.