शहापुरातील डोळखांब परिसरात बिबट्याचा वावर

शहापुर: शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीत डेहणे आज्या डोंगररांगा परिसरात साकुर्लीच्या ग्रामस्थांना बिबटयाचे दर्शन झाल्याने जंगल परिसरात फिरताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्राचे भौगोलीक क्षेत्रफळ १० हजार ५०० हेक्टरपर्यंत विस्तारले असून, ठाणे व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत घनदाट राखीव वनक्षेत्र आहे. या डेहणे गाव हद्दीत आज्या डोंगररांगांमध्ये रामायणकार वाल्मीक ऋषींच्या समाधीचे स्थळ, लव-कुश यांच्या पाळण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते. अनेक पर्यटक, भक्तगणांची या भागात नियमित वर्दळ असते.


डोळखांब वन विभागाचे अधिकारी नेहमीप्रमाणे गुंडे, डेहणे भागात वन परिक्षेत्रात गस्त घालत होते. त्यांना या भागात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या जंगली प्राणी खेचक (ट्रॅप) कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या. गुंडे, डेहणे हद्दीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी तातडीने डोळखांब वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांना दिली.


या वर्षी अवकाळी पडलेल्या पावसाने जंगलात शेवळी,तेलपाट, कुर्डू, कंदमुळे, रानभाज्या उगवल्या असून, अनेक महिला, नागरिक ती आणण्यासाठी जंगलात जात असतात. शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू झाली आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांची शेती जंगल भागात आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दिवसा जंगल भागात चरायला नेले जाते.


या सर्व बाबींचा विचार करून डोळखांब वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोळखांब परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गाव पाडे हद्दीत बिबट्यापासून सावध राहण्याचे फलक लावले आहेत. गाव, आदिवासी पाड्यांमध्ये वन कर्मचारी जाऊन ग्रामस्थांना एकत्रित करून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ग्रामस्थांना देत आहेत.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या