सुधाकर बडगुजरांची उद्धव सेनेतून हकालपट्टी

नाशिक : नाशिक शहर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपाक ठेवून सुधाकर बडगुजर यांच्यावर कावाई करण्यात आली आहे. बडगुजर लवकरच महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये उद्धव सेनेचे अनेकजण पक्षावर नाराज आहेत, असे संकेत दिले होते. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, असे सूतोवाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यामुळे महापालिका निवडणुकीआधी नाशिकमध्ये उद्धव गटाला धक्का बसणार अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.


उद्धव सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकर परिषदेला नाशिकचे उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख असूनही सुधाकर बडगुजर गैरहजर होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याचे बडगुजरांनी कळवले होते. पण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या सुमारास मुंबईतून फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे कळवण्यात आले. यानंतर ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली.


कोण आहेत सुधाकर बडगुजर ?


पक्षातून हकालपट्टी होण्याआधी सुधाकर बडगुजर उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख होते. ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे जवळचे म्हणून ओळखले जात होते. राजकारणातली कारकिर्द २००७ पासून सुरू करणाऱ्या बडगुजरांनी अल्पावधीत प्रगती केली होती. ते २००९ ते २०१२ या काळात नाशिक महापालिकेचे सभागृह नेते होते. तसेच २०१२ ते २०१५ दरम्यान बडगुजर नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. ते तब्बल १५ वर्ष नाशिक महापालिकेचे नगरसेवक होते.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक