सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांसाठी खुला

  67

पुणे : अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.आता गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होत आले असून उद्या, गुरुवार (दि.५) पासून सिंहगड किल्ला खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली.


याबाबत प्रांताधिकारी यशंवत माने म्हणाले, 'पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा येऊ नये, म्हणून गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. आता सर्व काम झाले आहे. पाडण्यात आलेला राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश देण्यात येणार आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.'


सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण व दरडी हटविण्याचे काम करताना रस्ता मोकळा मिळावा, तसेच कोणत्याही पर्यटकांना इजा होऊ नये, यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या