सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांसाठी खुला

पुणे : अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.आता गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होत आले असून उद्या, गुरुवार (दि.५) पासून सिंहगड किल्ला खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली.


याबाबत प्रांताधिकारी यशंवत माने म्हणाले, 'पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा येऊ नये, म्हणून गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. आता सर्व काम झाले आहे. पाडण्यात आलेला राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश देण्यात येणार आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.'


सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण व दरडी हटविण्याचे काम करताना रस्ता मोकळा मिळावा, तसेच कोणत्याही पर्यटकांना इजा होऊ नये, यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार