SBI News: आता व्हा मालामाल लखपती एसबीआयची सर्वसामान्यांसाठी ' हर घर लखपती योजना '

प्रतिनिधी: स्टेट बँक ऑफ इंडियाने ' हर घर लखपती ' नावाची योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. यामध्ये कमीत कमी रकमेवर जास्तीत जास्त परतावा (Return) सर्वसामान्य जनतेला शक्य होऊ शकते. प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम भरल्यास ठराविक काळानंतर चांगला परतावा मिळणार आहे. यावेळी बँकेने व्याजदरात ०.२० टक्क्याने कपात केली आहे.


गुंतवणूकदार १ लाख किंवा त्याहूनही अधिक गुंतवणूक करू शकतात. ३ ते १० वर्षांची मुदत या योजनेसाठी असणार आहे. जर पाच लाखांपर्यंत रक्कम असल्यास मात्र लवकर रक्कम काढल्यास ०.५० % दंडही बसू शकतो. त्याहून अधिक गुंतवणूक असल्यास व वेळेपूर्वी काढल्यास १% दंड बसू शकतो. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बँकेने मुद्दल (Principal) अधिकाधिक भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. मात्र जर वेळेत मुद्दल न भरल्यास मात्र दंड होऊ शकतो.


ही रक्कम आयकर मोजणीसाठी दखलपात्र असणार आहे.


काय आहे व्याजदर ?


सर्वसामान्य नागरिक -


३ वर्ष - ६.५५%, ४ वर्ष - ६.५५%, ५ वर्ष - ६.३० %, ६ वर्ष - ६.३०%, ७ वर्ष -६.३०%, ८ वर्ष - ६.३०%, ९ वर्ष -६.३०%, १० वर्ष - ६.३०%


ज्येष्ठ नागरिक - ३ वर्ष - ७.०५%, ४ वर्ष - ७.०५%, ५ वर्ष - ६.८०%, ६ वर्ष - ६.८०%, ७ वर्ष - ६.८०%, ८ वर्ष - ६.८०%, ९ वर्ष - ६.८०%, १० वर्ष - ६.८०%


जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज ४०००० रूपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ५०,००० रूपये), तर तुम्हाला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न या रकमेपेक्षा जास्त असेल तर १०% टीडीएस कापला जाईल.


पात्रता - या योजनेसाठी १० वर्ष किंवा त्याहून अधिक पाल्य पात्र असेल.


खाते कसे उघडावे?


या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क करा अथवा भेट द्या. या योजनेसाठी सर्व ती आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे