SBI News: आता व्हा मालामाल लखपती एसबीआयची सर्वसामान्यांसाठी ' हर घर लखपती योजना '

प्रतिनिधी: स्टेट बँक ऑफ इंडियाने ' हर घर लखपती ' नावाची योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. यामध्ये कमीत कमी रकमेवर जास्तीत जास्त परतावा (Return) सर्वसामान्य जनतेला शक्य होऊ शकते. प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम भरल्यास ठराविक काळानंतर चांगला परतावा मिळणार आहे. यावेळी बँकेने व्याजदरात ०.२० टक्क्याने कपात केली आहे.


गुंतवणूकदार १ लाख किंवा त्याहूनही अधिक गुंतवणूक करू शकतात. ३ ते १० वर्षांची मुदत या योजनेसाठी असणार आहे. जर पाच लाखांपर्यंत रक्कम असल्यास मात्र लवकर रक्कम काढल्यास ०.५० % दंडही बसू शकतो. त्याहून अधिक गुंतवणूक असल्यास व वेळेपूर्वी काढल्यास १% दंड बसू शकतो. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बँकेने मुद्दल (Principal) अधिकाधिक भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. मात्र जर वेळेत मुद्दल न भरल्यास मात्र दंड होऊ शकतो.


ही रक्कम आयकर मोजणीसाठी दखलपात्र असणार आहे.


काय आहे व्याजदर ?


सर्वसामान्य नागरिक -


३ वर्ष - ६.५५%, ४ वर्ष - ६.५५%, ५ वर्ष - ६.३० %, ६ वर्ष - ६.३०%, ७ वर्ष -६.३०%, ८ वर्ष - ६.३०%, ९ वर्ष -६.३०%, १० वर्ष - ६.३०%


ज्येष्ठ नागरिक - ३ वर्ष - ७.०५%, ४ वर्ष - ७.०५%, ५ वर्ष - ६.८०%, ६ वर्ष - ६.८०%, ७ वर्ष - ६.८०%, ८ वर्ष - ६.८०%, ९ वर्ष - ६.८०%, १० वर्ष - ६.८०%


जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज ४०००० रूपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ५०,००० रूपये), तर तुम्हाला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न या रकमेपेक्षा जास्त असेल तर १०% टीडीएस कापला जाईल.


पात्रता - या योजनेसाठी १० वर्ष किंवा त्याहून अधिक पाल्य पात्र असेल.


खाते कसे उघडावे?


या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क करा अथवा भेट द्या. या योजनेसाठी सर्व ती आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील