आमदार सुलभा गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

  54

केडीएमसी क्षेत्रातील कचरा संकलन शुल्कात केलेली वाढ रद्द करा


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३०० रुपयांची केलेली वाढ रद्द करण्याची मागणी कल्याण पूर्व मतदार संघाच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात घनकचरा व्यवस्थापन शुल्क जे ६०० रुपये होते, त्यात ३०० रुपये वाढ करून ९०० रुपये केलेले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलणे व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रथम योग्य अशी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. महानगरपालिका क्षेत्रात अजूनही जागोजागी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ठीग साचलेले नेहमी दिसून येत आहेत.


राज्यातील इतर महानगरपालिकेच्या तुलनेत फक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मालमत्ता कर जास्त प्रमाणात आकारला जातो, त्याच्या तुलनेत नागरिकांना कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांवर अन्यायकारक रित्या लादलेल्या करामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे व याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३००/- ची केलेली वाढ रद्द करण्याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास प्राधान्याने आदेश देण्याची मागणी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या