महाराष्ट्र पोस्टलकडून इंडिया पोस्ट : एक्स्पो सिम्पोजियमचे आयोजन

निर्यातदारांशी संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल


मुंबई : आंतरराष्ट्रीय पोस्टल (डाक) लॉजिस्टिक्स वाढविण्यासाठी आणि निर्यातदारांशी संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने मंगळवारी मुंबईतील मॅरियटच्या अझूर फेअरफील्ड येथे इंडिया पोस्ट : एक्स्पो सिम्पोजियमचे आयोजन केले.


जागतिक ई-कॉमर्स आणि सीमापार व्यापाराच्या वाढीसह, विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एसएमई) या संगोष्ठीने आंतरराष्ट्रीय निर्यात आणि लॉजिस्टिक्स इकोसिस्टममधील प्रमुख भागधारकांना एकत्र आणून सहयोगी वाढीच्या संधींचा शोध घेतला.


संवाद आणि नवोन्मेषासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे भारतीय डाक विभागाला मोठ्या प्रमाणात निर्यातदारांशी थेट संपर्क साधता आला आणि ईएमएस (स्पीड पोस्ट सर्व्हिस), इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट आणि इंटरनॅशनल बिझनेस पार्सल यासह त्यांच्या अत्याधुनिक जागतिक वितरण सेवा प्रदर्शित करता आल्या. यावेळी अमिताभ सिंह मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल; आर के मिश्रा, परराष्ट्र व्यापार महासंचालनालय; सुश्री केया अरोरा, संचालक डाक सेवा, मुंबई क्षेत्र, सुश्री सिमरन कौर, संचालक डाक सेवा (मुख्यालय) मुंबई आणि अभिजीत इचके, संचालक डाक सेवा, नवी मुंबई क्षेत्र या मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


या कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी जागतिक बाजारपेठेत नेव्हिगेट (संचार) करणाऱ्या भारतीय व्यवसायांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि सुलभ निर्यात लॉजिस्टिक्स भागीदार बनण्याच्या संस्थेच्या ध्येयावर भर दिला. ते पुढे म्हणाले, भारतीय डाक विभाग आधुनिक निर्यातदारांच्या गरजांनुसार टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. एक्स्पो सिम्पोजियम आंतरराष्ट्रीय व्यापार लॉजिस्टिक्समधील अंतर भरून काढण्यासाठी आणि एसएमई क्षेत्राला सक्षम करण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू