पाकिस्तान सीमेवर IAF ड्रिलसाठी हवाई हद्द राखीव; बंदी २३ जूनपर्यंत वाढवली, NOTAM जारी, तुर्की कंपनीवर बंदी

  71

नवी दिल्ली : भारताने ४ जून २०२५ रोजी पाकिस्तानच्या दक्षिण सीमेच्या जवळ भारतीय वायुदलाच्या (IAF) सरावासाठी हवाई हद्द राखून ठेवली असून, यासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आला आहे. हा एकदिवसीय लष्करी ड्रिल असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


दरम्यान, पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतीय हवाई हद्द वापरण्यावर असलेली बंदी २३ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी नुकतेच स्पष्ट केले.


ही बंदी पाकिस्तान नोंदणीकृत विमान, तसेच त्यांच्याकडून चालवलेली, मालकी असलेली किंवा भाड्याने घेतलेली प्रवासी आणि लष्करी विमानं यांना लागू आहे. मागील काही सुरक्षेच्या घटनांमुळे भारताने हा निर्णय कायम ठेवला आहे.



इंडिगो विमानाला वळण नाकारलं, वाद वाढला


२१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E 2142) ला पठाणकोट परिसरात वादळी हवामान आणि गारपिटीचा सामना करावा लागला. विमानाने दिशा बदलून आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने वळण घेण्याचा प्रयत्न केला, पण वायुदलाच्या नॉर्दर्न कंट्रोलने परवानगी नाकारली. नंतर लॉर एटीसीकडेही पाकिस्तानी हद्दीत प्रवेशाची विनंती करण्यात आली, पण तिथेही नकार मिळाला.



तुर्कीची 'सेलेबी' कंपनीवर सुरक्षा कारणास्तव बंदी


दुसऱ्या एका मोठ्या निर्णयात, तुर्कीची 'Celebi Airport Services' या ग्राउंड हँडलिंग कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. मंत्री नायडू म्हणाले की, "राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून विमानतळांवरील कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही."


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७० टक्के ग्राउंड सेवा ही 'सेलेबी'च सांभाळत होती. प्रवासी हाताळणी, माल वाहतूक, पोस्टल सेवा, गोदाम व्यवस्थापन, एअरब्रिज सेवा यासाठी ही कंपनी जबाबदार होती.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )