एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ 

१ कोटींचा अपघाती विमा; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिने मोफत प्रवास 


मुंबई (प्रतिनिधी) : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ, १ कोटी रुपयांचा अपघाती विमा तसेच ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित केलेल्या एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विविध कर्मचारी संघटनांचे नेते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांना पूर्वी मूळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता जून २०२५ पासून त्यामध्ये भर पडणार असून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सेवेतील ७८ हजार कर्मचाऱ्यांना हा लाभ होईल. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचा अपघाती विमा दिला जाईल.


अपघात झाल्यास विमा कवच लागू: एसटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, बसगाड्यासह बसस्थानके, स्वच्छतागृह व विश्रन कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर दिला पाहिजे. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजेत. एसटी तोट्यातून कर कशी काढता येईल. याचा अभ्यास करावा. एसटीकडे बघण्याया दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.


परिवहन महामंडळातील कर्मचान्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्याऱ्यांना कामगिरीवर असताना-नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास १ कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयापर्यंत विमा रक्कम दिली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : रिक्षा परवान्यांसाठी आता 'मराठी' सक्तीची

मागील १० वर्षांतील परवान्यांची होणार सखोल फेरतपासणी; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्र्यांचे

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंच्या नावावर बाराशे एकर जमीन असल्याचा दावा खोटा

सोशल मीडियावरील दिशाभूल महागात; खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल मुंबई : राज्याचे महसूल मंत्री

Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार

दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणी मुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची

भारतीय जहाज ग्रीन सान्वी' ४४,००० टन एलपीजी घेऊन होर्मुझहून रवाना

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई