भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम.


तुमचं रोजचं अन्न आरोग्यदायी असलं तरी प्रमाणाचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण सगळेच भाज्या आणि डाळी यांना "सुपरफूड" मानतो आणि त्या खरंच पोषणमूल्यांनी भरलेल्या असतात. पण हेल्थ कोच निपा आशाराम यांच्यानुसार, याच आरोग्यदायी अन्नाचं अति सेवन केल्यामुळे पोट फुगणं, अपचन आणि पचनसंस्थेचे त्रास सुरू होतात. त्यांनी नमूद केलं की, ५० ग्रॅम डाळ आणि १५०-३०० ग्रॅम भाज्यांपर्यंत मर्यादित सेवन हे योग्य आहे. यापेक्षा अधिक घेतल्यास फायबर आणि कॅलरीजचं प्रमाण वाढतं.



अति डाळी का टाळाव्यात?


काही डाळी (जसे मूग, मसूर) जास्त प्रमाणात घेतल्यास त्यातील ओलिगोसॅकाराइड्स मुळे पचन बिघडतं. जास्त तूप, तेल किंवा मलाई वापरून शिजवलेल्या डाळी कॅलोरीज वाढवतात. यामुळे वजन वाढू शकते. मधुमेह असणाऱ्यांसाठी जास्त डाळीतील कार्बोहायड्रेट्स हानिकारक ठरू शकतात.



भाज्यांचं अति सेवन का धोकादायक ठरतं?


फायबर जास्त झालं की पचनावर ताण येतो. फुगवटा, गॅस, अपचन यासारखे त्रास संभवतात. जास्त तेल, मसालेदार ग्रेव्ही वापरल्यास भाजी आरोग्यदायी राहात नाही. फक्त भाज्यांवर भर दिल्यास प्रथिनं व सत्त्वयुक्त फॅट्स चा अभाव होतो. यामुळे पोषणतूट होऊ शकते.



काय लक्षात ठेवावं?


डाळ १-२ लहान वाट्या, आणि भाज्या ३०० ग्रॅमपर्यंत ठेवा. डाळ शिजवताना कमी तेल, पचनास मदत करणारे मसाले वापरा, जसे हिंग, आलं, जिरे. आपल्या थाळीत धान्य, डाळी, भाज्या, फॅट्स आणि प्रथिने यांचा संतुलित समावेश असावा. पचनासाठी फायबर हळूहळू वाढवा आणि पुरेसं पाणी प्या. मधुमेह, किडनी, थायरॉईडसारख्या समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन आहार ठरवा.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे