Vaishnavi Hagawane Case: गळफास घेतलेल्या पंख्याची आणि साडीची देखील होणार फॉरेन्सिक तपासणी

पुणे: पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि मारहाणीला कंटाळून वैष्णवी हगवणेने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. ज्याच्या आरोपाखाली वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेसह सासरे, सासू, नणंद आणि दीर या सर्वांची पोलिस चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक बारीक सारिक गोष्टींची तपासणी केली जात आहे. ज्यामध्ये आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉपचा समावेश तर आहेच पण आता वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.



साडी आणि पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये रवाना


वैष्णवीने गळफास घेतला तो पंख किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. तसंच वैष्णवीचा पती, सासरा आणि दिराला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या तिघांची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यासाठी लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली