Vaishnavi Hagawane Case: गळफास घेतलेल्या पंख्याची आणि साडीची देखील होणार फॉरेन्सिक तपासणी

  80

पुणे: पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि मारहाणीला कंटाळून वैष्णवी हगवणेने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. ज्याच्या आरोपाखाली वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेसह सासरे, सासू, नणंद आणि दीर या सर्वांची पोलिस चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक बारीक सारिक गोष्टींची तपासणी केली जात आहे. ज्यामध्ये आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉपचा समावेश तर आहेच पण आता वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.



साडी आणि पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये रवाना


वैष्णवीने गळफास घेतला तो पंख किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. तसंच वैष्णवीचा पती, सासरा आणि दिराला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या तिघांची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यासाठी लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


Comments
Add Comment

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज