मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावात भरधाव बसची रिक्षाला धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू, ३ जखमी

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. २) रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर भरधाव खासगी बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक अशोक सोनार (६५) हे मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करीत होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडून जात असताना मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या बसची त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक लागली. या भीषण अपघात रिक्षाचालक अशोक सोनार यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी परी सोनार (११), अश्विनी दळवी (३०) व साईशा दळवी (४) हे तिघेजण जखमी झाले आहेत.



या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, बसचालक कालिदास बाबुराव कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार