मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावात भरधाव बसची रिक्षाला धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू, ३ जखमी

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. २) रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर भरधाव खासगी बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक अशोक सोनार (६५) हे मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करीत होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडून जात असताना मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या बसची त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक लागली. या भीषण अपघात रिक्षाचालक अशोक सोनार यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी परी सोनार (११), अश्विनी दळवी (३०) व साईशा दळवी (४) हे तिघेजण जखमी झाले आहेत.



या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, बसचालक कालिदास बाबुराव कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे