वृद्ध, सहव्याधी नागरिकांनी मास्कचा वापर करावा

  50

मुंबई : कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, वृध्द, सहव्याधी असलेले लोक आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या लोकांनी कमी हवेशीर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी मुख पट्टी अर्थात फेस मास्क वापरावा, अशाप्रकारचे निर्देश आरोग्य विभागाकडून महापालिकेला दिले आहेत.


राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे कोविड १९बाबतच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त्त यांना २ जून २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे केले आहे. यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जारी केलेल्या परिपत्रकांमध्ये असे म्हटले आहे. विविध कारणांमुळे होणारे इन्फ्लुएंझा, सार्स, आरएसव्ही सारखे विषाणूजन्य आजार हंगामी चढ-उतारम्हणून समुदायात दिसून येतात. सध्या प्रसारीत होणाऱ्या प्रकारामध्ये (व्हेरिएंट) जेएन१, एक्सएफजी आणि एलएफ ७.९ हे आहेत. या प्रकारांमुळे ताप, खोकला, घसा खवखवणे यासारखे सौम्य आजार होतात. देशात २८ मे २०२५ पर्यंत कोविड-१९ चे एकूण १६२१ रुग्ण सक्रिय आहेत,


देशातील एकुण सक्रिय प्रकरणांपैकी ९०% पेक्षा जास्त प्रकरणे केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या ६ राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अंदाजे ५०६ रुग्ण सक्रिय असून त्यामधील बहुतांश प्रकरणे मुंबईतील आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणे सौम्य असली तरी, पुरेशी खबरदारी म्हणून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना खालील उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा, उपजिल्हा पातळीवर तसेच वैद्यकीय महाविद्यालये, इतर शिक्षण/तृतीय सेवा संस्था, महानगरपालिका तथा नगरपरिषद रुग्णालये आणि इतर सर्व आंतररुग्ण सेवा सुविधांमध्ये रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला जावा. रोगनिदान, आवश्यक औषधे, पीपी किट, आयसोलेशन बेडस्, मेडीकल ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडस् यांच्या पुरेशा उपलब्धतेवर भर देण्यात यावा. एकंदर ऑक्सिजन प्रिपरनेस सुनिश्चित करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात यावे. याबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा कृती अहवाल तात्काळ सादर करावा.


तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्वयंनिरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य सुविधांना कळवावे. या मार्गदर्शक तत्वांनुसार याबाबतच्या आवश्यक संपूर्ण तयारीसाठी आपले सामूहिक प्रयत्न करावे अशाप्रकारचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये