अहिल्यानगर जिल्ह्यात पाच महिन्यांत ७८२ जण बेपत्ता

  57

१०४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पालकांची वाढली चिंता


अ. नगर : चोऱ्या, हाणामाऱ्या, अपहरण, विनयभंग, मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे. गत १४० दिवसांत १८ वर्षांखालील ११४ अल्पवयीन मुले राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्त्ता ११४ मध्ये १० मुले, तर तब्बल १०४ मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे.


पोलीस क्राईम रेव्ह्यूअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते २७ मे या साधारणतः पाच महिन्यांच्या कालावधीत १५ ते २४ वयोगटातील ७८२ जण बेपत्ता झाले आहेत. यात तब्बल ६१७ मुली, महिलांचा समावेश असून, १६५ मुलांची, युवकांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार संबंधित १४० दिवसांमध्ये दररोज पाच मुली, महिला घर सोडून निघून गेल्याचे पुढे आले आहे.


राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते. तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलीस अधीक्षकांना शहरासह १४ तालुक्यांतील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते. गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या अस्वस्थता वाढविणारी आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला