अहिल्यानगर जिल्ह्यात पाच महिन्यांत ७८२ जण बेपत्ता

१०४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पालकांची वाढली चिंता


अ. नगर : चोऱ्या, हाणामाऱ्या, अपहरण, विनयभंग, मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे. गत १४० दिवसांत १८ वर्षांखालील ११४ अल्पवयीन मुले राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्त्ता ११४ मध्ये १० मुले, तर तब्बल १०४ मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे.


पोलीस क्राईम रेव्ह्यूअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते २७ मे या साधारणतः पाच महिन्यांच्या कालावधीत १५ ते २४ वयोगटातील ७८२ जण बेपत्ता झाले आहेत. यात तब्बल ६१७ मुली, महिलांचा समावेश असून, १६५ मुलांची, युवकांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार संबंधित १४० दिवसांमध्ये दररोज पाच मुली, महिला घर सोडून निघून गेल्याचे पुढे आले आहे.


राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते. तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलीस अधीक्षकांना शहरासह १४ तालुक्यांतील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते. गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या अस्वस्थता वाढविणारी आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा