अहिल्यानगर जिल्ह्यात पाच महिन्यांत ७८२ जण बेपत्ता

१०४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पालकांची वाढली चिंता


अ. नगर : चोऱ्या, हाणामाऱ्या, अपहरण, विनयभंग, मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे. गत १४० दिवसांत १८ वर्षांखालील ११४ अल्पवयीन मुले राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्त्ता ११४ मध्ये १० मुले, तर तब्बल १०४ मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे.


पोलीस क्राईम रेव्ह्यूअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते २७ मे या साधारणतः पाच महिन्यांच्या कालावधीत १५ ते २४ वयोगटातील ७८२ जण बेपत्ता झाले आहेत. यात तब्बल ६१७ मुली, महिलांचा समावेश असून, १६५ मुलांची, युवकांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार संबंधित १४० दिवसांमध्ये दररोज पाच मुली, महिला घर सोडून निघून गेल्याचे पुढे आले आहे.


राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते. तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलीस अधीक्षकांना शहरासह १४ तालुक्यांतील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते. गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या अस्वस्थता वाढविणारी आहे.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे