Mumbai University Cracks Down : ४० लॉ महाविद्यालयांना प्रवेशबंदी; प्रवेशबंदी आणि १ लाखाचा दंड, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून ४० लॉ महाविद्यालयांना प्रवेशबंदी केल्याने चांगलाच दणका बसलेला आहे. मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने विधी अभ्यासक्रमांच्या ७४ पैकी ४० महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाने नोटिसा पाठवून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशसंख्या शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने या महाविद्यालयांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंबई विद्यापीठाने या महाविद्यालयांना CET प्रवेशासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यास नकार दिला असून त्यामुळे यंदा ३ व ५ वर्षांच्या LLB अभ्यासक्रमात सुमारे ४ हजार प्रवेश जागा कमी होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.



१० दिवसांत दंड न भरल्यास...


या महाविद्यालयांना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान पायाभूत सुविधा आणि महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्य, प्राध्यापक नसल्याचे उघडकीस आले. मुंबई विद्यापीठाने दंड भरण्यासाठी या कॉलेजेसना १० दिवसांची मुदत दिली असून तेवढ्या कावलावधीत दंड भरली नाही तर दरमहा १.५% व्याज आकारले जाणार. मात्र, या निर्णयानंतर विद्यार्थी संघटनांनी संपूर्ण महाविद्यालयांवर समान कारवाईची मागणी केली असून विद्यापीठाच्या परवानगी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ही विद्यालये केवळ कंत्राटी आणि तात्पुरत्या स्वरूपातील प्राध्यापकांच्या भरोश्यावर महाविद्यालये सुरू होती. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाला होता. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारून देखील ही महाविद्यालये त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अपयशी ठरली होती. तसेच, अनेक महाविद्यालयांत पायाभूत सुविधांची वानवा होती. त्यामुळे विद्यापीठाने या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.




सरसकट कारवाई होणार


मुंबई विद्यापीठाने ७४ पैकी ४० विधी महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. मात्र, पूर्णवेळ प्राचार्य आणि पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या सर्वच महाविद्यालयांवर सरसकट कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच, अशा महाविद्यालयांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते ॲड. सचिन पवार यांनी उपस्थित केला.



असा होणार परिणाम


सीईटी सेलतर्फे लवकरच LLB आणि ५ वर्षे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात केली जाईल. त्याकरिता महाविद्यालयांना नोंदणी करावी लागते. त्यासाठी विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि मान्यता दिलेल्या प्रवेश संख्येचे पत्र आवश्यक असते. यापूर्वी सीईटी सेलने महाविद्यालयांना नोंदणीसाठी ३० मेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांची नोंदणी अपूर्ण आहे. त्यामुळे नोंदणीला २ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यावर तोडगा न निघाल्यास या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होता येणार नाही.

Comments
Add Comment

Iran - America War : अमेरिका - इराण हल्ल्यात भारतीय जहाज बुडाले: एकाचा मृत्यू

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर

Minister Sanjay Shirsat : नाशिकमधील 'टीसीएस'प्रकरण म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचे रॅकेट, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

मुंबई : "नाशिकच्या 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद

Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव' मुंबई (विशेष प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना

Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना दिला चेकमेट; प्राधान्य क्रम नाकारलेला प्रस्ताव बहुमताने केला मंजूर

वडाळ्यातील आझादनगर, कमलानगर पुनर्विकास प्रकल्पाला मिळणार गती मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत वडाळा

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र