भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला

मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली


अकोले :अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व घरातील मायलेकावर हल्ला केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी राञी दिड वाजन्याच्या सुमारास घडली.दोन्ही मुलांच्या धाडसा मुळे आई बिबट्याच्या हल्यातून बचावली.या घटने मुळे देवठाण व परीसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.


किसनाबाई रामहारी काळे (वय -५७) व वैभव रामहारी काळे ( वय २७)अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देवठाण येथील पाटाच्या कडेला असणाऱ्या काळे वस्तीवरील घरात रात्री जेवणानंतर सर्व जन झोपलेले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मांजराच्या मागे बिबट्या लागला.तो दरवाजा तोडून थेट घरात गेला.घराचे दरवाजाचा आवाज आल्यामुळे किसनाबाई या उठल्या.त्यांनी बिबट्या पाहिल्या वर आरडा ओरडा केला. त्यामुळे त्यांची मुले उठली.त्यांनी आई किसनाबाई हिचे वर सुरू असणारा बिबट्याचा हल्ला परतावून लावला.पण या हल्ल्यात बिबट्याचा पंजा लागल्याने किसनाबाई यांचे डोक्याला गंभीर इजा झाली आहे.डोक्यातून मोठा रक्तस्राव वाहत होता.


उपचारा नंतर त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत तर वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला.या सर्व गोंधळात बिबट्या काही वेळ घरातील आतील खोली मध्ये शिरला.काही वेळ घरात थांबून होता. नंतर त्याने तेथून अलगद पोबारा केला.या घटनेची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी अकोले वनविभागाचे धिंदळे यांना फोन केला.त्यानंतर लगेचच धिंदळे व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली.


जखमींना प्रथमोउपचारासाठी किसनाबाई रामहारी काळे व वैभव रामहारी काळे यांना देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन नंतर नाशिक येथिल सिव्हिल रूग्णालयात येथे हलवण्यात आले होते. तेथून अकोले येथील डॉ. भांडकोळी हॉस्पटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.बिबट्याच्या या हल्ल्यामुळे देवठाण गाव व वस्ती परिसरात घबराट निर्माण झाली आहे. किसनाबाई रामहारी काळे व वैभव रामहारी काळे यांना वनविभागाकडुन तातडीने उपचार व मदत मिळावी पाहिजे व काळे वस्तीवर तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी देवठाण ग्रामस्थांनी केली आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे