कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार

रत्नागिरी (वार्ताहर) : कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेसाठी पावसाळी हंगामातील गाड्यांच्या वेळा आणि वेगावर मर्यादा येणार आहे. यंदा कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवीन वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. मुंबईतील स्थानकांतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल नसला तरी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकात येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल आहे.


मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या एक ते दोन तास लवकर येणार आहेत. या वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेगात ताशी ५० किलोमीटर असा बदल होणार आहे. यंदा पहिल्याच पावसात विलवडे स्थानकादरम्यान दरड कोसळली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसात कोकण रेल्वे सुरक्षित राहिली. गाड्यांचा वेगही सुसाट होता; मात्र, येत्या काळात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दक्षता घेत यंदा वेळापत्रकात बदल केला आहे.


कोकण रेल्वे मार्गावर धावणाच्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवे वेळापत्रक एर्नाकुलम जंक्शन ते पुणे (२२१४९) एर्नाकुलमहन पहाटे ५:१५ वाजता ऐवजी मध्यरात्री २:१५ वाजता निघेल. एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (२२६५५) एर्नाकलमाहन ५ः१५ ऐवजी ०२:१५ वाजता निघेल. मडगाव से मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस (१०१०७) मडगावहून पहाटे चारऐवजी ४.४० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते योगनगरी ऋषिकेश (२२६५९) तिरुवनंतपुरम उत्तर येथून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम (१२२१७) उत्तर चंदीगडला जाणारी गाडी तिरुवनंतपुरम (उत्तर) कडून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता निघेल.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक