कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार

  76

रत्नागिरी (वार्ताहर) : कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेसाठी पावसाळी हंगामातील गाड्यांच्या वेळा आणि वेगावर मर्यादा येणार आहे. यंदा कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवीन वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. मुंबईतील स्थानकांतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल नसला तरी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकात येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल आहे.


मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या एक ते दोन तास लवकर येणार आहेत. या वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेगात ताशी ५० किलोमीटर असा बदल होणार आहे. यंदा पहिल्याच पावसात विलवडे स्थानकादरम्यान दरड कोसळली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसात कोकण रेल्वे सुरक्षित राहिली. गाड्यांचा वेगही सुसाट होता; मात्र, येत्या काळात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दक्षता घेत यंदा वेळापत्रकात बदल केला आहे.


कोकण रेल्वे मार्गावर धावणाच्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवे वेळापत्रक एर्नाकुलम जंक्शन ते पुणे (२२१४९) एर्नाकुलमहन पहाटे ५:१५ वाजता ऐवजी मध्यरात्री २:१५ वाजता निघेल. एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (२२६५५) एर्नाकलमाहन ५ः१५ ऐवजी ०२:१५ वाजता निघेल. मडगाव से मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस (१०१०७) मडगावहून पहाटे चारऐवजी ४.४० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते योगनगरी ऋषिकेश (२२६५९) तिरुवनंतपुरम उत्तर येथून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम (१२२१७) उत्तर चंदीगडला जाणारी गाडी तिरुवनंतपुरम (उत्तर) कडून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता निघेल.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल