महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक
जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या यशस्वी तालुक्यांमध्ये जामखेड तालुक्याची निवड ही एक गौरवाची बाब आहे.ही कामगिरी राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानली गेली आहे.
या यशाबद्दल लाभार्थी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जामखेड तालुक्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,तसेच ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबई: राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान आता योजनेसंदर्भात मोठा निर्णय ...
महाअवास अभियान २०२२-२३ अंतर्गत जामखेड तालुक्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे,ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.याआधीही २०२१-२२ मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जामखेडने पटकावला होता.यशाचा हा सातत्यपूर्ण प्रवास वरिष्ठ अधिकारी,सहकारी कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार,ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.जामखेडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक उपलब्धी आहे, आणि ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
- प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी