जामखेडचा राज्यात डंका

  17

महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक


जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या यशस्वी तालुक्यांमध्ये जामखेड तालुक्याची निवड ही एक गौरवाची बाब आहे.ही कामगिरी राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानली गेली आहे.


या यशाबद्दल लाभार्थी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जामखेड तालुक्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,तसेच ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



महाअवास अभियान २०२२-२३ अंतर्गत जामखेड तालुक्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे,ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.याआधीही २०२१-२२ मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जामखेडने पटकावला होता.यशाचा हा सातत्यपूर्ण प्रवास वरिष्ठ अधिकारी,सहकारी कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार,ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.जामखेडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक उपलब्धी आहे, आणि ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
- प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या