जामखेडचा राज्यात डंका

महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक


जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या यशस्वी तालुक्यांमध्ये जामखेड तालुक्याची निवड ही एक गौरवाची बाब आहे.ही कामगिरी राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानली गेली आहे.


या यशाबद्दल लाभार्थी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जामखेड तालुक्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,तसेच ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



महाअवास अभियान २०२२-२३ अंतर्गत जामखेड तालुक्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे,ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.याआधीही २०२१-२२ मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जामखेडने पटकावला होता.यशाचा हा सातत्यपूर्ण प्रवास वरिष्ठ अधिकारी,सहकारी कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार,ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.जामखेडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक उपलब्धी आहे, आणि ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
- प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये