संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांना सॅप कोर्समुळे झेन्सर टेक्नॉलॉजित संधी

कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अ‍ॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो. अशाच सॅप विभाग व टी अँड पी विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


झेन्सर टेक्नॉलॉजिज ही एक डिजिटल सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असुन तिचे अस्तित्व जगभर आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पयुटर इंजिनिअरींगच्या राजवर्धन विलास जाधव, सिध्दांत सुधाकर नवथर, श्रीजित पोपट पानगव्हाणे, वेदांत निवृत्ती गोर्डे, गौरी बाबासाहेब चांदर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रोहित दत्तात्रय बुळे, शंतनू गोरक्षनाथ ढोकळे, वैभव परशराम वेताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शुभांगी प्रमोद आहेर, अथर्वराज सुभाष चोरमुंगे, हर्षद अतुल देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची स्नेहा बाळासाहेब शेळके, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव, आकांक्षा अरूण कार्ले व शुभम आण्णासाहेब देवगिरे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे