संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांना सॅप कोर्समुळे झेन्सर टेक्नॉलॉजित संधी

कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अ‍ॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो. अशाच सॅप विभाग व टी अँड पी विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


झेन्सर टेक्नॉलॉजिज ही एक डिजिटल सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असुन तिचे अस्तित्व जगभर आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पयुटर इंजिनिअरींगच्या राजवर्धन विलास जाधव, सिध्दांत सुधाकर नवथर, श्रीजित पोपट पानगव्हाणे, वेदांत निवृत्ती गोर्डे, गौरी बाबासाहेब चांदर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रोहित दत्तात्रय बुळे, शंतनू गोरक्षनाथ ढोकळे, वैभव परशराम वेताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शुभांगी प्रमोद आहेर, अथर्वराज सुभाष चोरमुंगे, हर्षद अतुल देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची स्नेहा बाळासाहेब शेळके, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव, आकांक्षा अरूण कार्ले व शुभम आण्णासाहेब देवगिरे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक