जलसंपदा अभियंत्याच्या घरावर छापा; खिडकीतून फेकले नोटांचे बंडल

घरात सापडले तब्बल २ कोटी!


भुवनेश्वर : सरकारी नोकरशाहीतील भ्रष्टाचाराचे थरकाप उडवणारे चित्र ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळाले. जलसंपदा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या बैकुंठनाथ सारंगी याच्या घरावर छापा टाकला असता, घाबरलेल्या सारंगीने थेट खिडकीतून रोख पैशांची बंडल बाहेर फेकण्याचा प्रकार घडला. ही घटना संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, या प्रकरणाचे थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.



ओडिशा राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (Vigilance Department) बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कारवाई करत सारंगीच्या अनेक ठिकाणच्या मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. त्याच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटवर छापा पडताच, खिडकीतून पाचशे रुपयांची बंडले फेकताना तो रंगेहाथ सापडला. सतर्क अधिका-यांनी तातडीने ती रोख रक्कम हस्तगत केली.



छाप्यात उघड झालेला पैसा पाहून अधिकारीही थक्क झाले. घराच्या विविध भागांत लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम, सोनं, मौल्यवान वस्तू आणि बँक खात्यांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या तपासात तब्बल २ कोटी रुपयांहून अधिकचा बेहिशेबी साठा समोर आला असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.





बैकुंठनाथ सारंगीच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याची संपत्ती संशयास्पदरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर