जलसंपदा अभियंत्याच्या घरावर छापा; खिडकीतून फेकले नोटांचे बंडल

घरात सापडले तब्बल २ कोटी!


भुवनेश्वर : सरकारी नोकरशाहीतील भ्रष्टाचाराचे थरकाप उडवणारे चित्र ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळाले. जलसंपदा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या बैकुंठनाथ सारंगी याच्या घरावर छापा टाकला असता, घाबरलेल्या सारंगीने थेट खिडकीतून रोख पैशांची बंडल बाहेर फेकण्याचा प्रकार घडला. ही घटना संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, या प्रकरणाचे थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.



ओडिशा राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (Vigilance Department) बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कारवाई करत सारंगीच्या अनेक ठिकाणच्या मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. त्याच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटवर छापा पडताच, खिडकीतून पाचशे रुपयांची बंडले फेकताना तो रंगेहाथ सापडला. सतर्क अधिका-यांनी तातडीने ती रोख रक्कम हस्तगत केली.



छाप्यात उघड झालेला पैसा पाहून अधिकारीही थक्क झाले. घराच्या विविध भागांत लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम, सोनं, मौल्यवान वस्तू आणि बँक खात्यांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या तपासात तब्बल २ कोटी रुपयांहून अधिकचा बेहिशेबी साठा समोर आला असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.





बैकुंठनाथ सारंगीच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याची संपत्ती संशयास्पदरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला