Onion Price Hike : महाराष्ट्रात कांदा महागणार? कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने केले नुकसान

साठवणुकीच्या अभावामुळे हजारो टन कांदा वाया, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


पुणे: ऐन मे महिन्यातील उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा आणि भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने पीक संपूर्ण नष्ट झाले आहे. तसेच, पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला. यामुळे हजारो टन कांदा कुजून गेल्यामुळे, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाव वाढीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात कांदा महागण्याची दाट शक्यता आहे.



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला, त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. पत्रात म्हटले आहे की, ६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.



नाफेडला पारदर्शक खरेदी करण्याचे आवाहन


संघटनेने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना सुद्धा आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा. ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा, अशी मागणी देखील केली आहे.



कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यास भाव वाढतात, हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे. सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,