Onion Price Hike : महाराष्ट्रात कांदा महागणार? कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने केले नुकसान

साठवणुकीच्या अभावामुळे हजारो टन कांदा वाया, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


पुणे: ऐन मे महिन्यातील उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे फळबागा आणि भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने पीक संपूर्ण नष्ट झाले आहे. तसेच, पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला. यामुळे हजारो टन कांदा कुजून गेल्यामुळे, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाव वाढीचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात कांदा महागण्याची दाट शक्यता आहे.



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला, त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. पत्रात म्हटले आहे की, ६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.



नाफेडला पारदर्शक खरेदी करण्याचे आवाहन


संघटनेने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना सुद्धा आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा. ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा, अशी मागणी देखील केली आहे.



कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागणी कायम असताना पुरवठा घटल्यास भाव वाढतात, हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे. सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट

अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर' विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी

Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार

Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा

Manjusha Nagpure : पुण्याचे महापौरपद सिंहगड रोडकडे! मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड; भाजप-राष्ट्रवादीच्या 'मैत्री'मुळे निवडणूक केवळ औपचारिकता

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) नव्या महापौर म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची