राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

अमरावती : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ४ एप्रिल २०२५ रोजी आदेश काढला होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर भरती होईल अशी अपेक्षा होती. पण आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २८ मे रोजी स्पष्ट निर्देश दिले की, सध्या कोणतीही नवीन शिक्षकेतर भरती केली जाणार नाही. आधी राज्यभरातील अतिरिक्त पदांचे समायोजन पूर्ण केले जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.


राज्यातील अनेक मान्यता प्राप्त, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या शिक्षकेतर पदांच्या भरतीची मागणी गेल्या काही काळापासून सुरू होती. ४ एप्रिल रोजी शासनाने यासाठी मंजुरी देत सुधारित आकृतीबंध लागू केला होता. यामुळे शिक्षण संस्था भरतीबाबत उत्सुक होत्या.


पण आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं की, २०२३-२४ च्या संच मान्यता दिल्या गेल्या असून २०२४-२५ च्या मान्यता प्रक्रियेसाठी NIC वर काम सुरू आहे. यानंतरच मंजूर, रिक्त व अतिरिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन समायोजन केलं जाईल.


सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत कोणतीही भरती किंवा लाभ देऊ नयेत, असंही डॉ. पालकर यांनी सांगितलं आहे. तसेच, जर भरती केली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे