पुण्यात आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुणे : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं नाविण्यपूर्ण परिवर्तन घडविण्यासाठी पुण्यात पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन होत आहे. १ ते ३ जून या कालावधीत होणाऱ्या कृषी हॅकेथॉनमध्ये युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणलं जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीनं शासनस्तरावर हे प्रयत्न होत आहेत. चला जाणून घेऊ या अधिक माहिती..



राज्य कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील कृषी महाविद्यालय यांच्या सहकार्याने कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आलंय. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्याबरोबरच खते, पाणी यांचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणारेय. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन कसं वाढेल, याचं मंथन या तीन दिवसात केलं जाईल.या उपक्रमात सुमारे दोन हजार शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित केलंय.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितल की, पुण्यातील कृषी महाविद्यालयात होणाऱ्या या ‘कृषी हॅकेथॉन’चं १ जून २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन होईल. ३ जून रोजी समारोप होणार असून यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत.

हॅकेथॉनमध्ये सव्वातीन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणारआहेत. विजेत्यांना विषयवार रोख परितोषिकं तसेच अग्रगण्य कृषी स्टार्टअप इनक्युबेटरकडून प्राधान्यानं इन्क्युबेशन व निधी साह्य दिले जाणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत एक हजार 800 जणांनी सहभाग नोंदवलाय. त्यातून ५६० जणांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलंय. त्यापैकी १४० जणांची निवड झालीय. यापैकी आठ गटांत प्रत्येकी दोघांची पुरस्कारासाठी निवड होणार आहे. या हॅकेथॉन स्पर्धेत आठ क्षेत्रांतील विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, तर द्वितीय विजेत्याला प्रत्येकी पंधरा लाख रुपये देण्यात येतील. हॅकेथॉनमध्ये एआयचा वापर करून शेतीचं सक्षमीकरण कसं करायचं या बद्दलची प्रकल्प देखिल सादर होणार आहेत.

लहान व अल्पभूधारक शेतक-यांसाठी कमी खर्चीक, सोपे व परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), डेटा अॅनालिटिक्स यांचा शेतीमध्ये वापर करणे, हवामान बदल, पाणीटंचाई यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर उपाय शोधण्याचा या मागचा उद्देश असणार आहे.
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक