मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच मोड' ऑन! मंत्र्यांच्या पीएस-ओएसडीवर कडक नजर; गडबड झाली तर थेट कारवाई!

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खासगी सचिव (PS) आणि विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) यांची निवड जरी पूर्ण झाली असली, तरी त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा वॉच मोड अजूनही कायम आहे. मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर असून गैरव्यवहाराची तक्रार आली तर खैर नाही, अशा भाषेत त्यांना बजावले आहे. त्यांच्या कामाचेही मूल्यमापन होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. केवळ नियुक्तीच नव्हे, तर आता त्यांच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून पुढे आली आहे.


कोणी काही चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जाते आणि बदली करण्याचीही तयारी ठेवली जात आहे. नियुक्ती झालेल्यांपैकी एक पीएस आणि एक ओएसडी यांना मुख्यमंत्री कार्यालयात बोलावून चांगलीच समज देण्यात आल्याची माहिती आहे. ‘चांगले काम करा, काही गडबड करणार असाल तर तुमच्यावर वॉच आहेच,’ याची जाणीव करून देत संबंधितांनी त्यांचे कान पिळल्याचे समजते.



या सरकारमध्ये आतापर्यंत ३५ पीएस आणि तब्बल ९० ओएसडी नियुक्त करण्यात आले आहेत. अजूनही काही मंत्र्यांकडील पदे भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक मंत्र्यांनी ‘आपल्याच माणसांना’ नियुक्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने त्यावर स्पष्ट भूमिका घेतली आणि प्रत्येक नावाची पारख करूनच मंजुरी दिली. संबंधित व्यक्तीचा आधीचा रेकॉर्ड, त्यांची विश्वासार्हता, आधीचं शासकीय कामकाज याचे काटेकोर मूल्यांकन सुरू आहे.


भाजपामधील एका वरिष्ठ मंत्र्याला आपला जुना पीएस हवाच होता, पण त्यांनाही ‘नो’ म्हणून नवीन पीएस नियुक्त करावा लागला. काही अधिका-यांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर नव्हत्या, त्यामुळे गैरसोयी निर्माण होत होत्या. ते वेळेवर उपस्थित रहात नव्हते. कामात अनेकदा व्यत्यय येत असे. हे लक्षात घेत, मंत्रालयाजवळ त्यांची सोय करण्यात आली आहे.


दरम्यान, काही पीएस आणि ओएसडींच्या वागणुकीबाबत साशंकता निर्माण झाली असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे. पुण्यात झालेल्या प्रशिक्षणातच सर्व नियुक्त अधिका-यांना साफ बजावले गेले होते की, “तुमच्याविरोधात कोणतीही गैरव्यवहाराची तक्रार आली, तर कारवाई अटळ असेल.”


मुख्यमंत्री कार्यालयाचा हा पवित्रा पाहता, मंत्र्यांच्या चमूतील कोणीही गडबड करण्याचा विचार करत असेल, तर आता सावध होण्याची वेळ आहे. कारण, यावेळी 'राजकीय ओळखी' नव्हे, तर केवळ कामगिरीवरच टिकाव लागणार आहे.

Comments
Add Comment

Priyanka Chopra : अहा! हातात बंदूक अन् पायात कोल्हापुरी, काशीबाईनंतर प्रियांका चोप्राच्या मराठमोळ्या लूकने घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित

मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवासाचा नवा फंडा; UTS अॅपचा गैरवापर करून रेल्वेला लावला जातोय गंडा?

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी दररोजचा प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र काही हुशार प्रवाशांनी या

मुंबई लोकलमध्ये घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चगेट-बोरिवली

Sunny Deol Angry On Paparazzi : 'तुम्हाला लाज वाटत नाही का?' धर्मेंद्र यांच्या दुःखात व्हिडिओ बनवणाऱ्या पॅपाराझींवर सनी देओल भडकला; आधी हात जोडले, मग चांगलेच झापले!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजुक असून, त्यांच्या

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर