तुंबलेल्या प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान; नालेसफाईच्या कामावर मंत्री आशीष शेलार नाराज

मुंबई : तुंबलेल्या प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे सोमवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळे निर्माण झाले आहेत. रस्ते, नाले यांच्याकडेला साफ केलेला कचरा तसेच उपसलेला गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. परिणामी छोट्या नाल्यांची सफाई वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.


सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, ३१ मे रोजी डेडलाइन असतानाही आतापर्यंत मोठ्या नाल्यांची ९१ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६४ टक्केच सफाई झाली आहे. रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे. शिवाय आधीच घरगुती कचरा, प्लास्टिक यामुळे छोटे नाले तुंबले असून, त्यांची सफाई करणे एक मोठी डोकेदुखी असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.



पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर प्रत्येकी १० टक्के गाळ काढला जातो. मात्र नालेसफाईच्या डेडलाइनसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आतापर्यंत एकूण ७४ टक्केच नालेसफाई झाली आहे. यात शहर, पश्चिम व पूर्व उपनगरे, मिठी नदी आणि छोट्या नाल्यांचा समावेश आहे.


छोट्या नाल्यांची सफाई लवकर व्हावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे पावसाळ्यात नदी, नाल्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील टाकाऊ वस्तूंचे संकलन, राडारोडा उचलणे, सर्वकष स्वच्छता केली जाणार आहे.



'श्वेतपत्रिका काढा'


राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी नालेसफाईच्या कामाच्या पाहणीनंतर नाराजी व्यक्त करताना या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील नाल्यांची पातमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यामुळे भरती आल्यानंतर सगळे पाणी जलवाहिन्यातून बाहेर रस्त्यावर फेकले जाते, परिणामी त्या भागात पाणी तुंबते. यावर पालिकेने काय उपाययोजना केल्या? किती पातमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षांत ती वर आणली याची माहिती त्यांनी पालिकेकडे मागितली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता