‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२५-२६) अहवालानुसार, आतापर्यंत तब्बल १८.९७ लाख परराज्यांतील शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य उचलले असून, केंद्र सरकारच्या या अंत्योदय योजनेचा मोठा आधार स्थलांतरित श्रमिकांना मिळाला आहे.


रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी 'आंतरराज्यीय पोर्टेबिलिटी' योजना सुरू करण्यात आली. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील १८.९७ लाख कार्डधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतले. याउलट, महाराष्ट्रातील १.४० लाख कार्डधारकांनी राज्याबाहेर असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. रेशन दुकानांवरील पारदर्शक ऑनलाईन यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे.


राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात सकस आहार देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेनेही उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ हजार ८७४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.



अहवालातील ठळक निष्कर्ष :


महाराष्ट्रात रेशन घेणारे परप्रांतीय - १८.९७ लाख
इतर राज्यांत रेशन घेणारे महाराष्ट्रीयन - १.४० लाख
एकूण शिवभोजन केंद्रे - १,८७४
वाटप झालेल्या एकूण थाळ्या - ४.०९ कोटी

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांना १६ ऑगस्टची डेडलाईन

 १ मे ते १५ ऑगस्टपर्यंत शिक्षण घेता येणार; मराठी मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित मुंबई : परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी

एआय धोरणातून दीड लाख रोजगार, तर लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावे अध्यासन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; हरित महाराष्ट्र आयोग आणि दिव्यांग शिष्यवृत्तीत मोठी वाढ मुंबई :

Kolhapur Crime : कोल्हापूर प्रकरणाला नवं वळण; १५ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एका गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : अमरावती परतवाडा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, तशीच पुनरावृत्ती कोल्हापूरमध्ये झाली आहे. एका

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत