‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२५-२६) अहवालानुसार, आतापर्यंत तब्बल १८.९७ लाख परराज्यांतील शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य उचलले असून, केंद्र सरकारच्या या अंत्योदय योजनेचा मोठा आधार स्थलांतरित श्रमिकांना मिळाला आहे.


रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी 'आंतरराज्यीय पोर्टेबिलिटी' योजना सुरू करण्यात आली. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील १८.९७ लाख कार्डधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतले. याउलट, महाराष्ट्रातील १.४० लाख कार्डधारकांनी राज्याबाहेर असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. रेशन दुकानांवरील पारदर्शक ऑनलाईन यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे.


राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात सकस आहार देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेनेही उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ हजार ८७४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.



अहवालातील ठळक निष्कर्ष :


महाराष्ट्रात रेशन घेणारे परप्रांतीय - १८.९७ लाख
इतर राज्यांत रेशन घेणारे महाराष्ट्रीयन - १.४० लाख
एकूण शिवभोजन केंद्रे - १,८७४
वाटप झालेल्या एकूण थाळ्या - ४.०९ कोटी

Comments
Add Comment

Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र

Childhood Cancer : बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी मिळणार आर्थिक सहाय्य

- त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत

BMC : मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; चार तलाव ओसंडून वाहत असतानाही बीएमसीची १०% पाणी कपात कायम

मुंबई: मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाचे तलाव पूर्णपणे भरले

BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Juhu Beach : जुहू चौपाटीवरील कचरा उचलण्यास विलंब का झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर करा कारवाई

मागील दहा वर्षातील कंत्राट कामाची चौकशी करा स्थायी समिती सदस्यांची मागणी मुंबई : मागील पावसाळ्यात विविध नाले