‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२५-२६) अहवालानुसार, आतापर्यंत तब्बल १८.९७ लाख परराज्यांतील शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य उचलले असून, केंद्र सरकारच्या या अंत्योदय योजनेचा मोठा आधार स्थलांतरित श्रमिकांना मिळाला आहे.


रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी 'आंतरराज्यीय पोर्टेबिलिटी' योजना सुरू करण्यात आली. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील १८.९७ लाख कार्डधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतले. याउलट, महाराष्ट्रातील १.४० लाख कार्डधारकांनी राज्याबाहेर असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. रेशन दुकानांवरील पारदर्शक ऑनलाईन यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे.


राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात सकस आहार देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेनेही उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ हजार ८७४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.



अहवालातील ठळक निष्कर्ष :


महाराष्ट्रात रेशन घेणारे परप्रांतीय - १८.९७ लाख
इतर राज्यांत रेशन घेणारे महाराष्ट्रीयन - १.४० लाख
एकूण शिवभोजन केंद्रे - १,८७४
वाटप झालेल्या एकूण थाळ्या - ४.०९ कोटी

Comments
Add Comment

Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर

Sanika Shah: मुंबईतील सानिका शाहची एव्हरेस्ट मोहिमेकडे वाटचाल; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : मुलुंड येथील २१ वर्षीय गिर्यारोहक सानिका जिगर शाह एव्हरेस्ट सर करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी

Elphinstone Bridge Update : आज रात्री प्रभादेवी पुलाचा ११३ वर्षांचा इतिहास जमा होणार; परंतु लोकल अन् एक्सप्रेवर...

मुंबई : मुंबईतील जुन्या बांधकामाचे पुनरुज्जीवन करून मुंबई आता पूर्णपणे नव्याने उदयाला येत आहे. त्यात

भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; कोणाकडे पुरावे असल्यास सादर करण्याचे आवाहन मुंबई : नाशिकमधील

Pratap Sarnaik : रिक्षा परवान्यांसाठी आता 'मराठी' सक्तीची

मागील १० वर्षांतील परवान्यांची होणार सखोल फेरतपासणी; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्र्यांचे

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत