छोट्या नाल्यांची ६४ टक्के, तर मोठ्या नाल्यांची ९१ टक्के सफाई

तुंबलेल्या प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान


मुंबई : दुसरीकडे सोमवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळे निर्माण झाले आहेत. रस्ते, नाले यांच्याकडेला साफ केलेला कचरा तसेच उपसलेला गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. परिणामी छोट्या नाल्यांची सफाई वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.


सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, ३१ मे रोजी डेडलाइन असतानाही आतापर्यंत मोठ्या नाल्यांची ९१ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६४ टक्केच सफाई झाली आहे. रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे. शिवाय आधीच घरगुती कचरा, प्लास्टिक यामुळे छोटे नाले तुंबले असून, त्यांची सफाई करणे एक मोठी डोकेदुखी असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.



पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर प्रत्येकी १० टक्के गाळ काढला जातो. मात्र नालेसफाईच्या डेडलाइनसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आतापर्यंत एकूण ७४ टक्केच नालेसफाई झाली आहे. यात शहर, पश्चिम व पूर्व उपनगरे,
मिठी नदी आणि छोट्या नाल्यांचा समावेश आहे.


घनकचरा विभागाचा मदतीचा हात


छोट्या नाल्यांची सफाई लवकर व्हावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे पावसाळ्यात नदी, नाल्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील टाकाऊ वस्तूंचे संकलन, राडारोडा उचलणे, सर्वकष स्वच्छता केली जाणार आहे.



'श्वेतपत्रिका काढा'


राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी नालेसफाईच्या कामाच्या पाहणीनंतर नाराजी व्यक्त करताना या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील नाल्यांची पातमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यामुळे भरती आल्यानंतर सगळे पाणी जलवाहिन्यातून बाहेर रस्त्यावर फेकले जाते, परिणामी त्या भागात पाणी तुंबते. यावर पालिकेने काय उपाययोजना केल्या? किती पातमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षांत ती वर आणली याची माहिती त्यांनी पालिकेकडे मागितली आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन