विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलग्याचा मृत्यू

बदलापूर : बदलापूर गावातील चिंतामणी चौकात अमृत टॉवरमध्ये राहत असलेल्या राजवीर अमृत लोखंडे या १४ वर्षांच्या बालकाचा गार्डनमध्ये खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पूर्वी कोपरी गाव, वाशी येथे राहणारे लोखंडे कुटुंबीय हे मागील १५ दिवसांपूर्वी बदलापूर गावातील अमृत टॉवर येथे राहायला आले होते.


शनिवारी रात्री अंदाजे ११ ते साडे अकराच्या सुमारास त्याच सोसायटीतील गार्डन मध्ये राजवीर खेळत होता. तेथे असलेल्या पोलच्या वायर ह्या उघड्यावर असल्याचे समजते. तो खेळत असताना याच पोलवर राजवीरचा तोल गेल्याने त्याला वायरचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले.



त्यामुळे संतापलेल्या लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोपर्यंत उघड्यावर ठेवलेल्या वायरच्या संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे