विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलग्याचा मृत्यू

  20

बदलापूर : बदलापूर गावातील चिंतामणी चौकात अमृत टॉवरमध्ये राहत असलेल्या राजवीर अमृत लोखंडे या १४ वर्षांच्या बालकाचा गार्डनमध्ये खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पूर्वी कोपरी गाव, वाशी येथे राहणारे लोखंडे कुटुंबीय हे मागील १५ दिवसांपूर्वी बदलापूर गावातील अमृत टॉवर येथे राहायला आले होते.


शनिवारी रात्री अंदाजे ११ ते साडे अकराच्या सुमारास त्याच सोसायटीतील गार्डन मध्ये राजवीर खेळत होता. तेथे असलेल्या पोलच्या वायर ह्या उघड्यावर असल्याचे समजते. तो खेळत असताना याच पोलवर राजवीरचा तोल गेल्याने त्याला वायरचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले.



त्यामुळे संतापलेल्या लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोपर्यंत उघड्यावर ठेवलेल्या वायरच्या संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या