विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलग्याचा मृत्यू

बदलापूर : बदलापूर गावातील चिंतामणी चौकात अमृत टॉवरमध्ये राहत असलेल्या राजवीर अमृत लोखंडे या १४ वर्षांच्या बालकाचा गार्डनमध्ये खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पूर्वी कोपरी गाव, वाशी येथे राहणारे लोखंडे कुटुंबीय हे मागील १५ दिवसांपूर्वी बदलापूर गावातील अमृत टॉवर येथे राहायला आले होते.


शनिवारी रात्री अंदाजे ११ ते साडे अकराच्या सुमारास त्याच सोसायटीतील गार्डन मध्ये राजवीर खेळत होता. तेथे असलेल्या पोलच्या वायर ह्या उघड्यावर असल्याचे समजते. तो खेळत असताना याच पोलवर राजवीरचा तोल गेल्याने त्याला वायरचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले.



त्यामुळे संतापलेल्या लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोपर्यंत उघड्यावर ठेवलेल्या वायरच्या संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी