राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.




 

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवासी कार चालकाने वाडा खडकोना गावाच्या हद्दीत समोर असणाऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाने कारला मागून धडक दिली. त्यामुळे अपघातग्रस्त कार दोन वाहनांच्या मध्ये चिरडल्या गेले. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात ग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कटरचा वापर करावा लागला.



अपघाताच्या या घटनेत ग्लोरिया वलेस (७३), क्लायटोन वलेस (४३), फबोलिया वलेस (४५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात घडला असून मनोर पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Shree Baba Neem Karoli Teaser : सुबोध भावेच्या बहुप्रतिक्षित 'बाबा नीम करोली' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अनेक वर्षांपासून काही दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक बनवले जातायत. यामध्ये खेळाडू,

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर