राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.




 

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवासी कार चालकाने वाडा खडकोना गावाच्या हद्दीत समोर असणाऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाने कारला मागून धडक दिली. त्यामुळे अपघातग्रस्त कार दोन वाहनांच्या मध्ये चिरडल्या गेले. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात ग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कटरचा वापर करावा लागला.



अपघाताच्या या घटनेत ग्लोरिया वलेस (७३), क्लायटोन वलेस (४३), फबोलिया वलेस (४५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात घडला असून मनोर पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.