अष्टविनायकाचा जीर्णोद्धार, विकासालाही मिळणार चालना

"गणपती बाप्पा मोरया!" महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा म्हणजे बाप्पा. आणि अष्टविनायक ही त्या भक्तीची, श्रद्धेची आणि परंपरेची सुंदर साखळी. अष्टविनायक यात्रेला जाणं म्हणजे केवळ मंदिरदर्शन नव्हे, तर अध्यात्मिक अनुभवांची एक अनोखी सफर आहे.आता ही यात्रा आणखी समृद्ध होणार आहे, कारण अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल १४८ कोटींचा विकास आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलाय. यामुळे काय बदलणार आहे, कोणत्या मंदिराला किती निधी मिळणार आहे, आणि भाविकांना काय नवे अनुभव मिळणार आहेत ...





गणपती म्हणजे विद्येची, बुद्धीची देवता. महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी श्री गणेशांची आठ मंदिरे आहे. त्याला अष्टविनायक म्हटलं जातं. या आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, व लेण्याद्री येथे पाच गणपती आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे दोन गणपती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं एक गणपती आहे. या अष्टविनायक मंदिरांचही रुपडं पालटणार आहे. कारण राज्य सरकारनं १८८ कोटींच्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यालाही मान्यता दिली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या धार्मिक वारशाचं जतन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं आहे. तसेच आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.


अष्टविनायकांचा महिमा अपार आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत असतात. भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात. मंदिराचा जीर्णोद्धार, विद्युतीकरण, नुतनीकरण, नागरी सुविधा, मंदिर परिसरांचा विकास करण्यासाठी सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गती देण्याचे प्रयत्न केले. पुढं ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळाली. काल, बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळालीय. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळणार असल्यानं स्थानिक नागरिक व भाविकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलाय.



आता कोणत्या मंदिराला किती निधी देण्यात येणार आहे ते पाहूया...



  • श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव (पुणे): ₹८ कोटी २१ लाख

  • श्री चिंतामणी मंदिर, थेऊर (पुणे): ₹7 कोटी 21 लाख

  • श्री विघ्नेश्वर मंदिर, ओझर (पुणे): 7 कोटी 84 लाख

  • श्री महागणपती मंदिर, रांजणगाव (पुणे): 12 कोटी 14 लाख

  • श्री वरदविनायक मंदिर, महाड (रायगड): २८ कोटी २४ लाख

  • श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली (रायगड): 26 कोटी 90 लाख

  • श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक (अहिल्यानगर): 9 कोटी 97 लाख


मंदिराच्या जीर्णोद्धार व्यतिरिक्त, विद्युतीकरण, प्रकाशयोजना, स्थापत्य सेवा आणि जीएसटी अशी एकूण ४७ कोटी ३९ लाख तरतूद करण्यात आली आहे. यामुळं हा एकूण खर्च १४७.८१ कोटींवर पोहोचला आहे.


अष्टविनायक मंदिरांचा विकास ही केवळ एक प्रशासकीय घोषणा नाही, तर तो महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या संवर्धनाचा मोठा टप्पा आहे. जीर्णोद्धारानंतर या मंदिरांना नवचैतन्य मिळेल, भाविकांची सोय-सुविधा वाढेल आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे "श्रद्धा, पर्यटन आणि विकास" यांचा सुंदर संगम घडणार आहे.

Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद