दहशतवादी कारवाई केली, तर ‘करारा जवाब’ देणार

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा


कानपूर : पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे मोठा धक्का बसला असून, त्यांनी युद्धविरामाची विनंती केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केले, या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून मोठे यश मिळवले आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाककडून कोणतीही दहशतवादी कारवाई झाली, तर त्याला ‘करारा जवाब’ दिला जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पाकिस्तानला दिला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत भारतीय लष्कराचे जोरदार कौतुक केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख करत, ही कारवाई भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रतीक ठरल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या शत्रूंना हादरवून टाकले आणि ब्रह्मोससारख्या देशात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांनी त्यांना झोप उडवली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना आता भारताकडून कडक उत्तर मिळेल. कानपुरी भाषेत सांगायचे तर, शत्रू जिथे असेल, तिथे त्याला धडा शिकवला जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून भारताने आत्मनिर्भरतेची प्रगती दाखवली आहे. ब्राह्मोस मिसाइल आणि इतर स्वदेशी शस्त्रास्त्रांनी शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.



भारताच्या शत्रूंना कठोर इशारा देताना मोदी म्हणाले, कोणीही भ्रमात राहू नये. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे शरण येत होते, त्यांनी हे लक्षात ठेवावे की ऑपरेशन संपलेले नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय मुलींचा व बहिणींचा संताप कृतीमध्ये रूपांतरित झाला, हे जगाने पाहिले. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ शेकडो मैल आत घुसून उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तान इतका हादरला की, संघर्ष थांबवण्यासाठी त्यांना विनवण्या कराव्या लागल्या.
मोदी पुढे म्हणाले की, भारताने तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत : प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल व त्यासाठी वेळ, पद्धत आणि अट या भारतीय लष्कराच्या हातात असतील. अणू युद्धाच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. दहशतवादी कारवाया घडवणारे मास्टरमाइंड व त्यांना मदत करणारी सरकारे या दोघांनाही सारखेच उत्तर दिले जाईल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जुनाच डाव भारत मान्य करणार नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.



मेक इन इंडियाचे कौतुक


मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे सामर्थ्य जगापुढे आले. मेक इन इंडियाअंतर्गत तयार झालेल्या आपल्या ब्रह्मोस मिसाईलने शत्रूच्या भूमीत घुसून अगदी नेमक्या ठिकाणी विध्वंस केला. एकेकाळी येथून पारंपरिक उद्योग निघून जात होते. पण आता मोठ्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या इथे येत आहेत. जवळच अमेठीत एके-२०३ रायफलचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूला झोप उडवणारी ब्रह्मोस मिसाईल – तिचा नवा पत्ता आता उत्तर प्रदेश आहे. काही लोक पाकिस्तानला खूश करण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. अशा लोकांना माफ करणे योग्य आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘दुर्दैवाने, काही लोकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर भ्रम निर्माण करण्याची संधी मिळते,’ असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी