'अग्निवीर’ राष्ट्रासाठी जळणारे अनसंग हिरो!

आपण पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करणा-या ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलतो, आपण त्या क्षणांचा अभिमानही बाळगतो. ज्या क्षणी भारताने शत्रूच्या छाताडावर आपली ताकद, बुद्धी आणि योजना यांचं तेज दाखवलं... पण यात एक गोष्ट आहे जी कुणीही बोलत नाहीये.. ती गोष्ट म्हणजे – ‘अग्निवीर’.


ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. पण याच्या मागे जे हात होते, ज्या डोळ्यांनी शत्रूला टिपलं, ते होते आपले अग्निवीर. वय फक्त वीस. पण धाडस असं की, शत्रूने थरथर कापावं. ते केवळ बंदुका चालवत नव्हते... ते आधुनिक क्षेपणास्त्र, रडार, आणि हाय-टेक संरक्षण प्रणालींवर हात फिरवत होते जणू काही व्हिडीओ गेमच खेळतायत.


पाकिस्ताननं ड्रोन पाठवले, मोर्टार डागले, क्षेपणास्त्रं झाडली. पण आपल्या अग्निवीरांनी ३ हजार ३२३ किलोमीटर सीमाभाग अखंड ठेवला. एकही स्फोट, एकही चूक – नाही. भारताची ढाल म्हणावी अशी ही यंत्रणा... आणि तिचा आत्मा होते अग्निवीर.


काही लोक म्हणाले होते.. "ही अग्निपथ योजना फसवी आहे, या तरुणांवर एवढी जबाबदारी देणं धोकादायक आहे." पण आज इतिहास साक्ष देतोय, या तरुणांनीच पाकिस्तानला झणझणीत प्रत्युत्तर दिलं.


सरगोधा, मालीर, नूरखान – पाकिस्तानच्या या मोठ्या लष्करी छावण्यांना भारतानं एका पाठोपाठ एक उद्ध्वस्त केलं... आणि यामध्ये हात होता अग्निवीरांचा. ते फक्त सैनिक नाहीत, ते डिजिटल योद्धे आहेत. त्यांच्या बोटांमध्ये फक्त ट्रिगर नव्हता, तर रडार स्कॅनिंग, अग्नि नियंत्रण प्रणाली, आणि संवाद सिग्नलचं नेटवर्क होतं. त्यांनी चालवली.. L-70, Pechora, Akash, Shilka, Osa – हाय-टेक डिफेन्स सिस्टीम्स.


कोण म्हणतं की हे ‘नवे’ आहेत? हे तर 'नव्या भारताचे नवे अर्जुन' आहेत. फरक इतकाच.. यांच्याकडे धनुष्य नाही, क्षेपणास्त्रं आहेत. सारथीही आहे.. देशभक्ती.


आज इस्रायलचा Iron Dome ४० किलोमीटरमध्ये मर्यादित आहे, पण भारताच्या अग्निवीरांनी काश्मीरपासून कराचीपर्यंतचा शत्रू अडवला. GPS जॅमिंग असो, ड्रोन हल्ला असो.. हे सगळं प्रत्यक्षात करून दाखवलं आपल्या जवानांनी.



ऑपरेशन सिंदूर हा केवळ पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव नव्हता. हा त्यांचा ठेचलेला अहंकार होता, ज्यांनी अग्निपथ योजनेची खिल्ली उडवली. हे प्रत्युत्तर होतं, टीका करणाऱ्यांना, शंका घेणाऱ्यांना, देशाच्या नव्या पिढीवर विश्वास नसणाऱ्यांना. भारत बदलतो आहे. आता लढाई फक्त रणांगणावर नाही, ती संगणकावर, स्क्रीनवर आणि सेन्सरवर लढली जाते. आणि त्या रणांगणावर आपले अग्निवीर... पहिल्या रांगेत आहेत. त्यांना सलाम करणं पुरेसं नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवणं, ही आपली जबाबदारी आहे.


कारण ही फक्त गोष्ट नाही... ही त्या 'गोष्टीतल्या वीरांची' खरी कहाणी आहे... जी अजूनही अनेकांना ऐकू आलीच नाही... या मुलांनी दाखवून दिलं आहे की, देशप्रेम वय पाहून येत नाही, ते मनातून येतं... आणि ते मन जितकं धाडसी, तितकंच भारताचं भवितव्य उज्वल. अग्निवीर म्हणजे भारताचा आत्मविश्वास. अग्निवीर म्हणजे भारताची नवशक्ती. अग्निवीर म्हणजे आमच्या छातीवरचा अभिमानाचा पदक. आज आपण त्यांच्या शौर्याला, त्यागाला, आणि क्षमतेला केवळ वंदन करू शकतो. त्यांच्यासाठी हात जोडून, मस्तक झुकवून एवढंच म्हणूया... "जय जवान! जय अग्निवीर!जय हिंद!"

Comments
Add Comment

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत