बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणात मिळणार चाव्या

मुंबई उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांचे आश्वासन


मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली.



वरळी बीडिडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांची नव्या घरांचा उंच टॉवर उभा राहिला असून रहिवाशांचे काही प्रश्न व मागण्या होत्या म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी बांधकाम सुरू असलेल्या टॉवरची पाहणी केली व रहिवाशांच्या अडचणी प्रश्न समजून घेतले. सुमारे दोन तास येथील रहिवाशांचे प्रश्न ऐकून घेतले. यावेळी मिलिंद बोरिकर यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते. रहिवाशांनी नव्या इमारतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे अशी विनंती केली त्यानुसार मंत्री आशिष शेलार यांनी म्हाडा आणि महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले की, नव्या इमारतींमधील रहिवाशांची संख्या विचारात घेऊन नवीन पाण्याच्या लाईन टाकून पाणी उपलब्ध करून द्या असे निर्देश दिले.


तसेच पार्किंग टॉवरचे एक काम पुर्ण झालेले नाही त्यामुळे तात्पुरती स्वरुपात शेजारी असणाऱ्या जुन्या दोन इमारती पाडून पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी केल्या. त्या म्हाडाने मान्य केल्या तसेच पार्किंग लॉटरी पद्धतीने दिले जाईल, असेही बोरिकर यांनी सांगितले.


दरम्यान, लवकरात लवकर चाव्या वाटप करावे अशी मागणी रहिवाशांनी केली त्यावर बोरिकर यांनी येत्या श्रावणाच्या आत चाव्या ताब्यात देण्यात येतील, पाईप गँस आणि सुविधा ही उपलब्ध करून दिल्या जातील असेही बोरिकर यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील