आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकवणी घेतात त्यांना शिक्षक तसेच पाणी जोडणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण प्लम्बर अशा नावाने ओळखतो. परंतु, आता राज्य सरकार प्लम्बर या नावात बदल करून त्याचे वॉटर इंजिनिअर असे नामकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या व्यवसायाला समाजात अधिक मान्यता मिळेल.


मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सध्या प्लंबर हे घरगुती व औद्योगिक पाण्याच्या जोडण्या, नळांच्या दुरुस्त्या यांसारखी महत्त्वाचे कामे करत असले तरी त्यांना समाजात मिळणारा सन्मान फारसा नाही. त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.



याशिवाय, सरकार प्लंबरसाठी प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य प्रमाणपत्र कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील आणण्याच्या तयारीत आहे. ‘वॉटर इंजिनिअर’ या नव्या ओळखीमुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे आकर्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय अंतिम होण्यासाठी काही अधिकृत प्रक्रिया बाकी असली, तरी सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत होत आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्लम्बर व्यावसायिकांना सामाजिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत