सीबीएसई पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज

  35

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ३० मे ते १७ जून पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येतील. विलंब शुल्कासह १८ ते १९ जून दरम्यान अर्ज करता येतील. विद्यार्थी ३० मे पासून अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देऊन कंपार्टमेंट किंवा सुधारणा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. नियमित विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमधून अर्ज करावे लागतील.


१० वी आणि १२वी दोन्हीसाठी पुरवणी परीक्षा १५ जुलैपासून घेतल्या जातील. विलंब शुल्कासह अर्ज केल्यानंतर शाळांकडून अर्ज किंवा विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देणार नाही. शाळांना कंपार्टमेंट श्रेणीत ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एलओसी सादर करावा लागेल.



तसे झाले नाही तर संबधित विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी मिळणार नाही. बोर्डाशी संलग्न शाळांमधून २०२५ च्या दहावी परीक्षेत बसणारे आणि ‘कंपार्टमेंट म्हणजेच अनुत्तीर्ण घोषित केलेले नियमित विद्यार्थी एक किंवा दोन कंपार्टमेंट विषयांमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत.


यावर्षी बोर्डाशी संलग्न शाळांमधून ६ किंवा ७ विषयांसह दहावीची परीक्षा दिलेल्या आणि उत्तीर्ण घोषित झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत त्या विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत जास्तीत जास्त दोन विषयांसाठी बसू शकतील. अिधक माहितीसाठी वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ