अरे बापरे! सलग दोन महीने ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं; कोल्हापूरमध्ये पोलिसांनी केली सुटका

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोल्हापुर येथील राजारामपुरमध्ये ४० वर्षीय महिलेला तब्बल २ महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.  सदर महिला तिच्या भाच्याकडे राहत असून गेल्या दीड ते 2 महिन्यांपासून तिला बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला सलग दोन महीने साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलं आहे. सारिका साळी (40) असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची सुटका करण्यात आली आहे.



महिलेची मानसिक अवस्था खराब 


सारिका साळी या महिलेची मानसिक अवस्था चांगली नसून, रस्त्यावर फिरताना ती काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्यासमवेत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली  आहे. पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला सांखळदडांतून मुक्त केले आहे. या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर महिला तिच्या भाच्याकडे राहते. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून, याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करुन आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत