वैष्णवी आत्महत्या प्रकरण : पती, सासू आणि नणंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापूर्वी तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास पूर्ण झाल्याचे कारण देत आता त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिघा आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर, पोलीस तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. पोलिसांनी सुनावणीत पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरज पडल्यास आम्ही कोठडी मागू असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यानुसार या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ती मिळताच सासू आणि नणंद दोघींनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आता सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे तिघांना येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, "निलेश चव्हाण हा देखील या संपूर्ण कटात सहभागी होता. त्या दिवशी तो तिथेच होता," असा दावा अनिल कस्पटे यांनी केला आहे. पोलिसांनी आता निलेश चव्हाणचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. पोलिस तपास वेग घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार