वैष्णवी आत्महत्या प्रकरण : पती, सासू आणि नणंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  69

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापूर्वी तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास पूर्ण झाल्याचे कारण देत आता त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिघा आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर, पोलीस तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. पोलिसांनी सुनावणीत पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरज पडल्यास आम्ही कोठडी मागू असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यानुसार या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ती मिळताच सासू आणि नणंद दोघींनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आता सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे तिघांना येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, "निलेश चव्हाण हा देखील या संपूर्ण कटात सहभागी होता. त्या दिवशी तो तिथेच होता," असा दावा अनिल कस्पटे यांनी केला आहे. पोलिसांनी आता निलेश चव्हाणचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. पोलिस तपास वेग घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला