वैष्णवी आत्महत्या प्रकरण : पती, सासू आणि नणंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापूर्वी तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र तपास पूर्ण झाल्याचे कारण देत आता त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिघा आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर, पोलीस तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. पोलिसांनी सुनावणीत पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरज पडल्यास आम्ही कोठडी मागू असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यानुसार या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ती मिळताच सासू आणि नणंद दोघींनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आता सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे तिघांना येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, "निलेश चव्हाण हा देखील या संपूर्ण कटात सहभागी होता. त्या दिवशी तो तिथेच होता," असा दावा अनिल कस्पटे यांनी केला आहे. पोलिसांनी आता निलेश चव्हाणचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. पोलिस तपास वेग घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा