पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ

विदेशी पर्यटकांनी २०२६ चेही बुकींग केले रद्द


काश्मिर : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली होती. ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही विदेशी पर्यटकांकडून २०२६ चे जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


डियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीसह जगभरातील अनेक देशातील पर्यटकांकडून जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु करायचे असेल तर आपले एक डेलीगेशन अनेक देशात जाऊन एडवाइजरी हटवण्याची मागणी करायला हवी असे ते म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे पर्यटन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. आता जम्मू काश्मीरचे पर्यटन हळूहळू सुरु होत आहे. पण अद्याप आंतरराष्ट्रीय पर्यटक जम्मू काश्मीरकडे आलेले नाहीत.


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी २००६ चे ही बुकिंग रद्द केल्याची माहिती इंडियन असोसिएशन टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिली आहे. भारतातील तसेच परदेशातील पर्यंटक काश्मिरशिवाय राहूच शकत नाही. जगातील सर्वांधिक सुंदर पर्यटन स्थळ जम्मू-काश्मिर असल्याने काही दिवसानंतर दहशतवादी हल्ल्यांचा प्रभाव पर्यंटक विसरुन जातील व जम्मू-काश्मिरला पुन्हा गर्दी करतील, असा दावा पर्यंटक अॅड. राहूल पवार यांनी व्यक्त केला आहे.



अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरच्या २०२६ च्या बुकिंग रद्द केल्या आहेत. जर हे सुरु करायचे असेल तर इतर देशांनी लावलेल्या एडवाइजरी काढव्या लागतील असे दीपक मनवानी म्हणाले. आपल्याला देशातून डेलीगेशन पाठवावे लागेल आणि सांगावे लागेल की जम्मू काश्मीर सुरक्षित आहे. अमरनाथ यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक नोंदणी करतील का? हे ही मुश्किल आहे. त्यांना आणावे लागेल. येत्या ६ महिन्यांमध्ये जर अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल त्यामुळे मग पर्यटन वाढेल आणि पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.


टूरिस्ट कंपनी जे आहेत ते ही नीट पॅकेज तयार करत आहेत. पण अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षिततेचा विषय समोर येईल. त्यांनतरच आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि इतर पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)