पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ

विदेशी पर्यटकांनी २०२६ चेही बुकींग केले रद्द


काश्मिर : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली होती. ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही विदेशी पर्यटकांकडून २०२६ चे जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


डियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीसह जगभरातील अनेक देशातील पर्यटकांकडून जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु करायचे असेल तर आपले एक डेलीगेशन अनेक देशात जाऊन एडवाइजरी हटवण्याची मागणी करायला हवी असे ते म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे पर्यटन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. आता जम्मू काश्मीरचे पर्यटन हळूहळू सुरु होत आहे. पण अद्याप आंतरराष्ट्रीय पर्यटक जम्मू काश्मीरकडे आलेले नाहीत.


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी २००६ चे ही बुकिंग रद्द केल्याची माहिती इंडियन असोसिएशन टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिली आहे. भारतातील तसेच परदेशातील पर्यंटक काश्मिरशिवाय राहूच शकत नाही. जगातील सर्वांधिक सुंदर पर्यटन स्थळ जम्मू-काश्मिर असल्याने काही दिवसानंतर दहशतवादी हल्ल्यांचा प्रभाव पर्यंटक विसरुन जातील व जम्मू-काश्मिरला पुन्हा गर्दी करतील, असा दावा पर्यंटक अॅड. राहूल पवार यांनी व्यक्त केला आहे.



अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल


आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरच्या २०२६ च्या बुकिंग रद्द केल्या आहेत. जर हे सुरु करायचे असेल तर इतर देशांनी लावलेल्या एडवाइजरी काढव्या लागतील असे दीपक मनवानी म्हणाले. आपल्याला देशातून डेलीगेशन पाठवावे लागेल आणि सांगावे लागेल की जम्मू काश्मीर सुरक्षित आहे. अमरनाथ यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक नोंदणी करतील का? हे ही मुश्किल आहे. त्यांना आणावे लागेल. येत्या ६ महिन्यांमध्ये जर अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल त्यामुळे मग पर्यटन वाढेल आणि पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.


टूरिस्ट कंपनी जे आहेत ते ही नीट पॅकेज तयार करत आहेत. पण अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षिततेचा विषय समोर येईल. त्यांनतरच आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि इतर पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.

Comments
Add Comment

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६

Crocs Styling Tips : Crocs ला स्टायलिश लुक देण्यासाठी फॉलो करा 'या' ७ टिप्स...

१. Crocs म्हणजे फक्त आरामदायी (Comfortable) Footwear (फुटवेअर) नाही! योग्य स्टाईलिंग (Styling) केल्यास Crocs तुमच्या फॅशन (Fashion) लुकला चार चाँद

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन