रस्ते, गल्लीबोळांची होणार स्वच्छता

मुंबई : मुंबईतील नदी आणि नाल्यांमध्ये पावसाळ्यात आसपासचा कचरा वाहून पुन्हा नाल्यांमध्ये जात असल्याने हा सर्व कचरा आणि राडारोडा उचलण्याची मोहिम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेद्वारे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व पर्जन्य जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार आणि प्रवासह सुरळीत राखला जाईल,असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त
केला आहे.


मुंबईतील पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजण्यापूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने नियमित स्वच्छतेसोबत विशेष पुढाकार घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा गोळा व स्वच्छता करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर टाकून देण्यात आलेल्या वस्तू, साहित्य यांचे संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी