रस्ते, गल्लीबोळांची होणार स्वच्छता

मुंबई : मुंबईतील नदी आणि नाल्यांमध्ये पावसाळ्यात आसपासचा कचरा वाहून पुन्हा नाल्यांमध्ये जात असल्याने हा सर्व कचरा आणि राडारोडा उचलण्याची मोहिम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेद्वारे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व पर्जन्य जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार आणि प्रवासह सुरळीत राखला जाईल,असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त
केला आहे.


मुंबईतील पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजण्यापूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने नियमित स्वच्छतेसोबत विशेष पुढाकार घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा गोळा व स्वच्छता करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर टाकून देण्यात आलेल्या वस्तू, साहित्य यांचे संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.