महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. राज्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ३२ टक्के जास्त परकीय गुंतवणूक आली.

भारतात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. देशात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात एकूण चार लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.

महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम करणारे ठरले. हा विक्रम महाराष्ट्राने नऊ महिन्यांतच मोडला.

आर्थिक वर्ष २०१५ - १६ : ६१,४८२ कोटी
आर्थिक वर्ष २०१६ - १७ : १,३१,९८० कोटी
आर्थिक वर्ष २०१७ - १८ : ८६,२४४ कोटी
आर्थिक वर्ष २०१८ - १९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी
आर्थिक वर्ष २०२० - २१ : १,१९,७३४ कोटी
आर्थिक वर्ष २०२१ - २२ : १,१४,९६४ कोटी
आर्थिक वर्ष २०२२ - २३ : १,१८,४२२ कोटी
आर्थिक वर्ष २०२३ - २४ : १,२५,१०१ कोटी
आर्थिक वर्ष २०२४ - २५ : १,६४,८७५ कोटी



Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत