महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. राज्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ३२ टक्के जास्त परकीय गुंतवणूक आली.

भारतात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. देशात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात एकूण चार लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.

महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम करणारे ठरले. हा विक्रम महाराष्ट्राने नऊ महिन्यांतच मोडला.

आर्थिक वर्ष २०१५ - १६ : ६१,४८२ कोटी
आर्थिक वर्ष २०१६ - १७ : १,३१,९८० कोटी
आर्थिक वर्ष २०१७ - १८ : ८६,२४४ कोटी
आर्थिक वर्ष २०१८ - १९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी
आर्थिक वर्ष २०२० - २१ : १,१९,७३४ कोटी
आर्थिक वर्ष २०२१ - २२ : १,१४,९६४ कोटी
आर्थिक वर्ष २०२२ - २३ : १,१८,४२२ कोटी
आर्थिक वर्ष २०२३ - २४ : १,२५,१०१ कोटी
आर्थिक वर्ष २०२४ - २५ : १,६४,८७५ कोटी



Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा