महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

  85

मुंबई : महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे २०२४ - २५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. राज्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ३२ टक्के जास्त परकीय गुंतवणूक आली.

भारतात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. देशात २०२४ - २५ या आर्थिक वर्षात एकूण चार लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.

महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नवा विक्रम करणारे ठरले. हा विक्रम महाराष्ट्राने नऊ महिन्यांतच मोडला.

आर्थिक वर्ष २०१५ - १६ : ६१,४८२ कोटी
आर्थिक वर्ष २०१६ - १७ : १,३१,९८० कोटी
आर्थिक वर्ष २०१७ - १८ : ८६,२४४ कोटी
आर्थिक वर्ष २०१८ - १९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी
आर्थिक वर्ष २०२० - २१ : १,१९,७३४ कोटी
आर्थिक वर्ष २०२१ - २२ : १,१४,९६४ कोटी
आर्थिक वर्ष २०२२ - २३ : १,१८,४२२ कोटी
आर्थिक वर्ष २०२३ - २४ : १,२५,१०१ कोटी
आर्थिक वर्ष २०२४ - २५ : १,६४,८७५ कोटी



Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये