मेट्रो स्थानकात पाणी न साचण्यासाठी करावी लागणार उपाययोजना

मुंबई : मागील सोमवारी शहर भागांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरळी आचार्य अत्रे रेल्वे स्थानक परिसरात पाणी शिरल्याने भविष्यात या मेट्रो स्थानकात असेच पाणी शिरले जाईल का अशाप्रकारची भीती वजा शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. परंतु मुंबई मेट्रो वनच्या माध्यमातून या स्थानकांच्या परिसरातील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी स्वत: पंप बसवण्याचा यंत्रणा उभी केली असली तरी यासर्व स्थानक परिसरातील आजवर पडलेला पाऊस आणि साचलेला पाऊस याची माहिती जाणून घेवून मेट्रो आणि महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने संयुक्त सर्वे करून उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


मुंबई शहरातील काही भागांमध्ये सोमवारी सरासरी २०० ते २२५ मि.मी पावसाची नोंद झाल्याने या अचानक कोसळलेल्या पहिल्या पावसातच वरळीतील आचार्य अत्रे ऍक्वॉ मेट्रो रेल्वे स्थानकात प्रवेश मार्गाच्या परिसरात पाणी तुंबल्याने तात्पुरती उभारलेली भिंत कोसळली गेली आणि यातून साचलेले पाणी स्थानकात शिरले. या परिसरातील पर्जन्य जलवाहितील पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे न झाल्याने तसेच समुद्राला त्याच वेळी मोठी भरती असल्याने याठिकाणी पाणी साचले गेले आणि त्यामुळे भिंत कोसळून पाणी शिरले. परंतु ही स्थिती पहिल्याच पावसात घडल्याने भविष्यात काय होईल अशाप्रकारची भीती लोकांच्य मनात निर्माण झाली आहे.


मेट्रो रेल्वेची बहुतांशी रेल्वे स्थानके चौकांमध्ये तथा पर्जन्य जलवाहिन्या जिथे वक्राकार वळल्या जात आहेत,त्याठिकाणी आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह याच ठिकाणी संथ होवून जातो आणि अशातच समुद्राला मोठ्या स्वरुपाची भरती आणि पाऊस एकाच वेळी आल्यास भविष्यात अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसर हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे, तेथील मागील २० ते २५ वर्षांत किती पावसाची नोंद झाली आहे, किती वेळा पाणी साचले आहे. तेथील पर्जन्य जलवाहिनीची स्थिती आदीची माहिती संकलित करून महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पुढील उपाययोजना आखल्यास योग्य ठरेल असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोच्यावतीने रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु, हे पंप अंतर्गत स्थानकाच्या परिसरात असतील तर मग बाहेरील बाजुस साचणाऱ्या पंपासाठी महापालिकेच्यावतीने अतिरिक्त पंप बसवले जाणार आहेत की मेट्रो स्वत: बसवणार याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद