मेट्रो स्थानकात पाणी न साचण्यासाठी करावी लागणार उपाययोजना

मुंबई : मागील सोमवारी शहर भागांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरळी आचार्य अत्रे रेल्वे स्थानक परिसरात पाणी शिरल्याने भविष्यात या मेट्रो स्थानकात असेच पाणी शिरले जाईल का अशाप्रकारची भीती वजा शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. परंतु मुंबई मेट्रो वनच्या माध्यमातून या स्थानकांच्या परिसरातील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी स्वत: पंप बसवण्याचा यंत्रणा उभी केली असली तरी यासर्व स्थानक परिसरातील आजवर पडलेला पाऊस आणि साचलेला पाऊस याची माहिती जाणून घेवून मेट्रो आणि महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने संयुक्त सर्वे करून उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


मुंबई शहरातील काही भागांमध्ये सोमवारी सरासरी २०० ते २२५ मि.मी पावसाची नोंद झाल्याने या अचानक कोसळलेल्या पहिल्या पावसातच वरळीतील आचार्य अत्रे ऍक्वॉ मेट्रो रेल्वे स्थानकात प्रवेश मार्गाच्या परिसरात पाणी तुंबल्याने तात्पुरती उभारलेली भिंत कोसळली गेली आणि यातून साचलेले पाणी स्थानकात शिरले. या परिसरातील पर्जन्य जलवाहितील पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे न झाल्याने तसेच समुद्राला त्याच वेळी मोठी भरती असल्याने याठिकाणी पाणी साचले गेले आणि त्यामुळे भिंत कोसळून पाणी शिरले. परंतु ही स्थिती पहिल्याच पावसात घडल्याने भविष्यात काय होईल अशाप्रकारची भीती लोकांच्य मनात निर्माण झाली आहे.


मेट्रो रेल्वेची बहुतांशी रेल्वे स्थानके चौकांमध्ये तथा पर्जन्य जलवाहिन्या जिथे वक्राकार वळल्या जात आहेत,त्याठिकाणी आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह याच ठिकाणी संथ होवून जातो आणि अशातच समुद्राला मोठ्या स्वरुपाची भरती आणि पाऊस एकाच वेळी आल्यास भविष्यात अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसर हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे, तेथील मागील २० ते २५ वर्षांत किती पावसाची नोंद झाली आहे, किती वेळा पाणी साचले आहे. तेथील पर्जन्य जलवाहिनीची स्थिती आदीची माहिती संकलित करून महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पुढील उपाययोजना आखल्यास योग्य ठरेल असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोच्यावतीने रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु, हे पंप अंतर्गत स्थानकाच्या परिसरात असतील तर मग बाहेरील बाजुस साचणाऱ्या पंपासाठी महापालिकेच्यावतीने अतिरिक्त पंप बसवले जाणार आहेत की मेट्रो स्वत: बसवणार याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे यांचा नवा अंदाज! महाराष्ट्रातील 'वहिनीं'साठी घेऊन येत आहेत 'वहिनीसाहेब सुपरस्टार' शो

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून बाहेर पडलेले डॉ. निलेश साबळे आता एका नव्या

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात