लातूर : उदगीरकडे जाताना ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ३४ जण जखमी

  245

लातूर : लातूरमध्ये दोन प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून उदगीरकडे जाणाऱ्या कृष्णा व अभिनव ट्रॅव्हल्सचा गुरूवारी पहाटे ५ वाजता उदगीरकडे जात असताना औसा तालुक्यातील उजनी पासून एक किलो मिटर अंतरावर अपघात झाला. या घटनेत दोन जण ठार तर ३४ जण जखमी आहे. त्यात ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.




ट्रॅव्हल्सचा क्लिनर जागीच ठार


तुळजापूर ते लातूर महामार्गावर उजनी नजीक गुरुवारी पहाटे एकता बियर बार जवळ उदगीरकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्स क्रमांक AR ०१ Y ३५५५ या गाडीला पाठीमागून आलेली अभिनव ट्रॅव्हल्स MH २४ W १२१२ या गाडीने जोराची धडक दिली. यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस जागीच पलटी होऊन त्यात ३४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अभिनव ट्रॅव्हल्सचा क्लिनर नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी (वय ४०, रा अळवाई. ता भालकी. जि बीदर) हा जागीच ठार झाला.



या घटनेची माहिती मिळताच लातूर येथील पोलीस महामार्गचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले, योगीराज नागरगोजे व भादा पोलिस निरीक्षक महावीर जाधव, रतन मोरे, अनंत कांबळे, माऊली फड, अनंत शिंदे यांनी धाव घेतली. तसेच उजनी येथील हॉटेल चालक व कामगारांना मदतीसाठी बोलवण्यात आले. मयत नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी यांचे पार्थिव उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या