लातूर : उदगीरकडे जाताना ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ३४ जण जखमी

लातूर : लातूरमध्ये दोन प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून उदगीरकडे जाणाऱ्या कृष्णा व अभिनव ट्रॅव्हल्सचा गुरूवारी पहाटे ५ वाजता उदगीरकडे जात असताना औसा तालुक्यातील उजनी पासून एक किलो मिटर अंतरावर अपघात झाला. या घटनेत दोन जण ठार तर ३४ जण जखमी आहे. त्यात ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.




ट्रॅव्हल्सचा क्लिनर जागीच ठार


तुळजापूर ते लातूर महामार्गावर उजनी नजीक गुरुवारी पहाटे एकता बियर बार जवळ उदगीरकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्स क्रमांक AR ०१ Y ३५५५ या गाडीला पाठीमागून आलेली अभिनव ट्रॅव्हल्स MH २४ W १२१२ या गाडीने जोराची धडक दिली. यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस जागीच पलटी होऊन त्यात ३४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अभिनव ट्रॅव्हल्सचा क्लिनर नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी (वय ४०, रा अळवाई. ता भालकी. जि बीदर) हा जागीच ठार झाला.



या घटनेची माहिती मिळताच लातूर येथील पोलीस महामार्गचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले, योगीराज नागरगोजे व भादा पोलिस निरीक्षक महावीर जाधव, रतन मोरे, अनंत कांबळे, माऊली फड, अनंत शिंदे यांनी धाव घेतली. तसेच उजनी येथील हॉटेल चालक व कामगारांना मदतीसाठी बोलवण्यात आले. मयत नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी यांचे पार्थिव उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार - मुख्यमंत्री

दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार लातूर : राज्यात अनेक ठिकाणी

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सोलापूर :

याला म्हणतात जिगरबाज! ७६ वर्षांचा गुराखी वाघाशी भिडला आणि जिंकला!

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीट परिसरात ७६ वर्षांच्या गुराख्याने

Solapur Flood : पहिला महामार्ग बंद अन् आता 'वंदे भारत'लाही फटका...सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये पूरस्थिती गंभीर

सोलापूर : राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोलापुर जिल्ह्यातील

Devendra Fadanvis : अतिवृष्टीने माढ्यात शेतीचं मोठं नुकसान, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट पाहणी, मदतीचे आश्वासन

सोलापूर : महाराष्ट्रात पावसाचा तुफान थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली