राहाता शहरातील १२५ वर्षांपूर्वीची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत ?

राहाता : शहरातील नगरपरिषद हद्दीतील मिळकत क्रमांक ३०००६०१ मधील सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची असलेली इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने सदरची इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी कुठलेही वाईट दुर्घटना घडू शकते त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ संबंधित मिळकत धारक यांना सदरची इमारत जमीन उध्वस्त करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील इतर अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामाची प्रशासनाने पाहणी करून संबंधित मिळकत धारकांना खबरदारीचे उपाय घेण्याबाबत सूचना द्याव्यात असे निवेदन शहरातील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना दिले आहे.


मुख्याधिकारी लोंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहाता शहरातील गावठाण हद्दीतील मिळकत क्रमांक ३०००६०१ व जुना ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७५४ मध्ये असलेले इमारतीचे बांधकाम जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे असल्याने सदरच्या इमारतीची अवस्था ही जीर्ण झाल्याने ही इमारत कुठल्याही क्षणी कोसळू शकते या ठिकाणी हनुमान मंदिर तसेच मज्जित असल्याने शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात. तसेच हा परिसर वर्दळीच्या ठिकाणी असल्याने येथे नागरिक दैनंदिन कामासाठी रस्त्यावरून ये जा करत असतात. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात सदर इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी या इमारतीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.नगरपरिषदेने तात्काळ सदर इमारतीची पाहणी करून संबंधित मिळकत धारकाला सदर इमारत काढून टाकण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामाची प्रशासनाने पाहणी करून संबंधित बांधकाम धारकांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना द्याव्यत अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब सदाफळ, राहुल सदाफळ, सागर सदाफळ,जय आग्रे, सुरज गायकर, अँड रामनाथ सदाफळ, सागर बोठे, उत्तम बोठे, योगेश रुईकर, बबनराव गायकवाड व आदी शहरातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे