अबब! गडकरींच्या पत्नीच्या शेतात भले मोठे कांदे!

  136

नागपूर : नागपूरच्या धापेवाडा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'भक्ती फार्म'वर सेंद्रिय शेतीचा एक आश्चर्यजनक आणि प्रेरणादायी प्रयोग घडून आला आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी येथे सेंद्रिय कांद्याचं यशस्वी उत्पादन घेतलं असून या कांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन प्रत्येकी जवळपास ८०० ग्रॅम ते तब्बल १ किलो आहे.


या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी स्वतः एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी कांद्याचे बियाणे कुठून आणले, कोणती शेती तंत्रज्ञान वापरली, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसं घेतलं याची सविस्तर माहिती दिली आहे.


या प्रयोगासाठी वापरण्यात आलेली कांद्याची बियाणं नेदरलँड्समधून आयात करण्यात आली होती. Seminis या कंपनीच्या बियांची २.५ किलोची बॅच एका एकर शेतात पेरण्यात आली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि बायो-सेंद्रिय खतांनी जमीन समृद्ध करण्यात आली. पाणीपुरवठा अत्याधुनिक डबल ड्रिप इरिगेशन पद्धतीने करण्यात आला.



नर्सरीतून उगवलेल्या रोपांची लागवड त्यानंतर दुसऱ्या भागात करण्यात आली. एकूण २४,००० कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान फक्त ७ ते १० टक्के रोपे नष्ट झाली, जे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तुलनेने खूपच कमी नुकसान मानलं जातं. शेवटी उत्पादन घेतल्यावर प्रत्येकी कांद्याचं वजन ४०० ग्रॅमपासून ते ८००-१००० ग्रॅमपर्यंत नोंदवलं गेलं.


गडकरी यांनी म्हटलं की, “या प्रक्रियेदरम्यान सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. कोणीही सेंद्रिय शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे सांगितलं की या एक एकर जमीनीतून १२ ते १३ टन सेंद्रिय कांद्याचं उत्पादन मिळालं आहे.


हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करत आहे. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी नैसर्गिक पद्धतीने अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकतं, हे गडकरींच्या शेतातून पुन्हा सिद्ध झालं आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या