अबब! गडकरींच्या पत्नीच्या शेतात भले मोठे कांदे!

  116

नागपूर : नागपूरच्या धापेवाडा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'भक्ती फार्म'वर सेंद्रिय शेतीचा एक आश्चर्यजनक आणि प्रेरणादायी प्रयोग घडून आला आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी येथे सेंद्रिय कांद्याचं यशस्वी उत्पादन घेतलं असून या कांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन प्रत्येकी जवळपास ८०० ग्रॅम ते तब्बल १ किलो आहे.


या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी स्वतः एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी कांद्याचे बियाणे कुठून आणले, कोणती शेती तंत्रज्ञान वापरली, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसं घेतलं याची सविस्तर माहिती दिली आहे.


या प्रयोगासाठी वापरण्यात आलेली कांद्याची बियाणं नेदरलँड्समधून आयात करण्यात आली होती. Seminis या कंपनीच्या बियांची २.५ किलोची बॅच एका एकर शेतात पेरण्यात आली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि बायो-सेंद्रिय खतांनी जमीन समृद्ध करण्यात आली. पाणीपुरवठा अत्याधुनिक डबल ड्रिप इरिगेशन पद्धतीने करण्यात आला.



नर्सरीतून उगवलेल्या रोपांची लागवड त्यानंतर दुसऱ्या भागात करण्यात आली. एकूण २४,००० कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान फक्त ७ ते १० टक्के रोपे नष्ट झाली, जे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तुलनेने खूपच कमी नुकसान मानलं जातं. शेवटी उत्पादन घेतल्यावर प्रत्येकी कांद्याचं वजन ४०० ग्रॅमपासून ते ८००-१००० ग्रॅमपर्यंत नोंदवलं गेलं.


गडकरी यांनी म्हटलं की, “या प्रक्रियेदरम्यान सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. कोणीही सेंद्रिय शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे सांगितलं की या एक एकर जमीनीतून १२ ते १३ टन सेंद्रिय कांद्याचं उत्पादन मिळालं आहे.


हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करत आहे. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी नैसर्गिक पद्धतीने अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकतं, हे गडकरींच्या शेतातून पुन्हा सिद्ध झालं आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून