रानमेवा विक्रेत्या महिलांना त्रास; आदिवासी सेनेचे आंदोलन

इगतपुरी: पावसाळ्यापूर्वी निसर्गात बहरणाऱ्या रानभाज्या, रानमेवा, करवंदे विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी महिलांवर रेलसुरक्षा बलाकडून होणारा त्रास आणि दंडेलशाहीमुळे आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.


रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्थानकात निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी रेल प्रबंधक राऊत व संबंधीत प्रशासनास निवेदन देण्यात आले.


इगतपुरी तालुक्यात डोंगरकडे कपाऱ्यात राहुन निसर्गाने बहरलेल्या रानमेवा, रान भाज्या, करवंदे, जांभळे, आळवे, आंबे हा रानमेवा विक्री करण्यासाठी आदिवासी महिला रेल्वे स्थानकात पाट्या घेऊन उभ्या रहातात. कोणताही आवाज व धावपळ न करता प्रवाशांना रानमेवा विक्री करतात. या व्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात.


मात्र रेल्वे स्थानकात या आदिवासी महिलांना पोलीस आणि रेल सुरक्षा बलाचे अधिकारी हुसकावुन देत त्यांचे रानमेवा, फळं, भाज्या फेकुन देत असल्याने आदिवासी महिलांचा रोजगार व मेहनत वाया जावुन अनेकवेळा उपासमार सहन करावी लागते. रेल्वे प्रशासनाने या गरीब आदिवासींना त्रास न देता व्यवसाय करण्याची मुभा द्यावी अशी मागणी आदिवासी सेनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये तृतियपंथी, गुटखा पान मसाला, बाहेरील पदार्थ विक्री करणारे हॉकर्स मोठ्या प्रमाणात आहेत. यांना मात्र कोणीही हुसकावत नसुन प्रामाणिकपणे रानमेवा विक्री करणाऱ्या महिलांना त्रास दिला जात असेल तर हे सहन करणार नाही. याकरीता रेल्वे डिव्हीजन मॅनेजरला घेराव घालुन आंदोलन केले जाईल असा इशारा दि. ना. उघाडे यांनी दिला.


या प्रसंगी राजाराम ठाकरे, सविता सर्जेराव, अंबिका गांगड, निर्मला वारे, संगीता वारे, सया कामडी, बापवारे, जया लहामटे, चांगुना झुगरे, तारा शिंगवे, शिवा रौजांळ, संतुबा झुगरे, जनाबाई उघडे, अंजना वारे, कमल ठाकरे, झिगरू कातवारे, विमल पेहरे, दुर्गा आरशेंडे, इंदु पारधी, सिता वारघडे, श्रीधर विर यांच्यासह आदिवासी महिला उपस्थीत होत्या.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी