जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

मंबई : दरवर्षी दहा जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होते. पण यंदा मे महिन्यात म्हणजे जवळपास दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत येऊन धडकला. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून २०२५ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०८ टक्के जास्त असेल. यामुळे यंदा जून महिन्यात मागील सोळा वर्षांचे पावसाचे रेकॉर्ड मोडीत निघतील, जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला असला तरी २८ किंवा २९ मे पासून ५ जून पर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नियमानुसार भरपाई देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.
Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा