उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

नागरिकांना सर्तकतेचा इशारा


बदलापूर : आधी उन्हाच्या झळांनी असह्य केले आणि आता ऐन उन्हाळ्यात बदलापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून जनजीवन विस्कळीत केले. सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. दुपारी नदीने धोक्याची पातळीही ओलांडली. त्यामुळे बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आणि संध्याकाळी पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली.



बदलापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत माथेरान पट्ट्यातही पावसाचा जोर असल्याने सकाळपासून उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. दुथडी भरून वाहत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढून उल्हासनदीने १७.५० मी ही धोक्याची पातळीही ओलांडली. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकाळपासून शहराच्या भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.


तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. उद्घोषणा करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खबरदारी म्हणून काही वेळ उल्हासनदी पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नदी परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.


उल्हास नदी परिसरात ठिकठिकाणी शहरांसह गावे मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. पाऊस असाच राहिला तर या गावांना ही सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. त्यामुळे नदी काठावर, डोंगराळ भागात, धबधब्याचे ठिकाणी, नदीच्या पाण्यात, धरण क्षेत्र आधी ठिकाणी पावसाच्या कालावधीत नागरिकांनी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये