उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

  48

नागरिकांना सर्तकतेचा इशारा


बदलापूर : आधी उन्हाच्या झळांनी असह्य केले आणि आता ऐन उन्हाळ्यात बदलापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून जनजीवन विस्कळीत केले. सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. दुपारी नदीने धोक्याची पातळीही ओलांडली. त्यामुळे बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आणि संध्याकाळी पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली.



बदलापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत माथेरान पट्ट्यातही पावसाचा जोर असल्याने सकाळपासून उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. दुथडी भरून वाहत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढून उल्हासनदीने १७.५० मी ही धोक्याची पातळीही ओलांडली. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकाळपासून शहराच्या भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.


तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. उद्घोषणा करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खबरदारी म्हणून काही वेळ उल्हासनदी पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नदी परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.


उल्हास नदी परिसरात ठिकठिकाणी शहरांसह गावे मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. पाऊस असाच राहिला तर या गावांना ही सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. त्यामुळे नदी काठावर, डोंगराळ भागात, धबधब्याचे ठिकाणी, नदीच्या पाण्यात, धरण क्षेत्र आधी ठिकाणी पावसाच्या कालावधीत नागरिकांनी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे

जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या

अन्यथा ठेकेदाराला कल्याण-डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा कल्याण  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा

घोडबंदर रोड सिग्लनजवळ वेग नियंत्रक पट्ट्या प्रायोगिक तत्वावर लावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे  : घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्त्वावर

रिक्षा चालकांवरील दंडात्मक कारवाई थांबवा

रिक्षा-टॅक्सी संघर्ष कृती समितीतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा कल्याण  : कल्याण शहर वाहतूक शाखा व पोलीस विभागाच्या

‘माझी टीएमटी ॲप’ला प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद

ठाणे  : प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी

आदिवासी गरोदर महिलेला डोलीतून नेण्याची नामुष्की !

ठाण्याच्या दुर्गम भागातील समस्या आजही कायमच ठाणे : एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वातंत्र्याचा