Savarkar Jayanti: भगूरला आज सावरकर जयंती उत्सव

पूर्वसंध्येला सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळले


दे. कॅम्प: भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीचे (Swatatryaweer Sawarkar Birth Aniversary) आयोजन बुधवारी (दि. २८) करण्यात आले आहे. सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सकाळी ८ वाजता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक गोटे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. त्यानंतर नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली बागेश्री ग्रुप सावरकर गीतांचे सादरीकरण करणार आहे.


स्मारकात सावरकरांनी लिहिलेली तसेच त्यांच्यावर आधारित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.सकाळी ८ वाजता स्वा. सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गायकवाड गल्लीपासून सावरकर ग्रंथ दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व शरद पोंक्षे, तसेच अनेक आमदार व खासदार सहभागी होणार आहेत.


सकाळी ९ वाजता अभिनव भारत पार्टीच्या वतीने चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. सावरकर जयंतीच्या निमित्ताने भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, व संभाजी देशमुख करत आहेत.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.