Savarkar Jayanti: भगूरला आज सावरकर जयंती उत्सव

  48

पूर्वसंध्येला सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळले


दे. कॅम्प: भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीचे (Swatatryaweer Sawarkar Birth Aniversary) आयोजन बुधवारी (दि. २८) करण्यात आले आहे. सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सकाळी ८ वाजता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक गोटे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. त्यानंतर नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली बागेश्री ग्रुप सावरकर गीतांचे सादरीकरण करणार आहे.


स्मारकात सावरकरांनी लिहिलेली तसेच त्यांच्यावर आधारित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.सकाळी ८ वाजता स्वा. सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गायकवाड गल्लीपासून सावरकर ग्रंथ दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व शरद पोंक्षे, तसेच अनेक आमदार व खासदार सहभागी होणार आहेत.


सकाळी ९ वाजता अभिनव भारत पार्टीच्या वतीने चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. सावरकर जयंतीच्या निमित्ताने भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, व संभाजी देशमुख करत आहेत.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात