सरळ सेवा भरतीतील सहायक अभियंत्यांची यादी होणार जाहीर

मुंबई : महावितरणकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण/स्थापत्य) ३४२ उमेदवारांची सहायक अभियंता पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान अपात्र व गैरहजर तसेच नियुक्तीपत्रातील विहीत मुदतीमध्ये रुजू न झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणात महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.



महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल. महावितरणच्या जाहिरात क्र. ०७/२०२३ अन्वये अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण-३०२ व स्थापत्य-४०) सहायक अभियंता पदाच्या ३४२ जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली आहे. त्याप्रमाणे दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सहायकअभियंता पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.



कनिष्ठ अभियंतापदी ९१ उमेदवारांना नियुक्तिपत्र


कनिष्ठ अभियंतापदी अभियांत्रिकी पदविकाधारक ९१ उमेदवारांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सरळ सेवा भरतीद्वारे ७२ तर अनुकंपा तत्त्वानुसार १९ उमेदवांराची निवड करण्यात आली आहे. अर्जासोबत या उमेदवारांना परिमंडलस्तरावर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास