Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या वकिलाचा युक्तिवाद, वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन करण्याचा प्रयत्न

  111

पुणे: सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर कोर्टात झाली. यादरम्यान वैष्णवीचा पती शशांक हगवणे बरोबरच, तिचा सासरा राजेंद्र हगवणे तसेच सासू, नणंद आणि दीर या पाचही अटक आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी, आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली आहे. तर, आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते, असा युक्तिवाद वकिलाने केला आहे.


दरम्यान, फिर्यादीच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावताना वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असे म्हंटले आहे.



हगवणेंच्या वकिलाचा युक्तिवाद


फिर्यादीच्या वकिलांकडून लावण्यात आलेल्या आरोपावर हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात भाष्य केलं.  तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचे औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्याचप्रमाणे कस्पटेकडे फॉर्च्युनर गाडीची मागणी केली असल्याचा आरोप फेटाळताना, हगवणे यांकडे आधीच पाच कोटींच्या गाड्या आहेत, तर आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी कशाला छळ  करू, असा युक्तिवाद करत वकिलाने पोलीस कोठडीऐवजी न्यायायलयीन कोठडी देण्याची मागणी केली.



आरोपी वकिलांची न्यायालयीन कोठडीची मागणी फेटाळली


यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले. तर, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. याप्रकरणी, आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.


दरम्यान, फिर्यादीच्या वकिलांनी पाचही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.  याप्रकरणातील फरार निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी करायची अद्याप बाकी आहे‌. शिवाय अद्याप पाचही आरोपींचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यांच्या मोबाईलमध्ये काही महत्वपूर्ण व्हिडीओ शुटींग असू शकतात. तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याची देखील अजून माहिती घ्यायची आहे. शिवाय  वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. त्यामुळे, आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांनी केली होत. त्यानुसार, न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे.  ‌ त्याचप्रमाणे आरोपी निलेश चव्हाणला अडकवण्यात येत असल्याचंही वकिलांनी म्हटलं आहे.



निलेश चव्हाणला अकडवण्यात आलंय


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण याचे नाव देखील प्रामुख्याने येते. वैष्णवीचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. जे आता वैष्णवीच्या आई बाबांकडे म्हणजेच कस्पटे कुटुंबांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या केसमध्ये निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचं असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. उलट निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला आहे. पण, त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या.पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌, असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा